Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Palmistry Line : जोडीदार मिळाल्यानंतर ‘या’ लोकांचे उजळणार भाग्य

6

हस्तरेषाशास्त्रात अशा रेषांबाबत सांगितले गेले आहे की, ज्या लग्नानंतर तुमचे आयुष्य सावरतात. विवाह हा आपल्या सर्वांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा भाग मानला जातो. एक अशी परंपरा, संस्कार ज्यावर पुढील जीवन अवलंबून आहे. चांगला, समजूतदार आणि प्रेमळ जोडीदार मिळाला तर माणसाच्या जीवनाचा कायापालट होतो. त्या रेषा कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

हस्तरेषाशास्त्र

अनेक वेळा असे दिसून येते की, एखाद्या व्यक्तीच्या लग्नानंतर अचानक त्याचे भाग्य बदलते आणि तो व्यक्ति आर्थिकदृष्ट्या मजबूत होतो. हस्तरेषा शास्त्रात अशा काही रेषा सांगितल्या आहेत की तुमच्या आयुष्यात तुमचा जोडीदार आल्यानंतर तुमचे नशीब उजळेल. आज आम्ही तुम्हाला तळहातावर असलेल्या अशा रेषा आणि अशाच काही खुणांबद्दल सांगणार आहोत. या रेषा कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

​चंद्र पर्वतातून निघणारी रेषा

चंद्र पर्वतातून निघणारी रेषा खूप भाग्यवान मानली जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या चंद्र पर्वतावरून भाग्यरेषा निघून शनीच्या पर्वतापर्यंत पोहोचली तर ही रेषा खूप शुभ मानली जाते आणि हा खूप शुभ योग बनतो. अशा लोकांना परदेशातून पैसा मिळतो आणि अशा बहुतेक लोकांचे नशीब लग्नानंतर चमकते.

​अशा लोकांचे वैवाहिक जीवन सुखाचे

ज्यांच्या हातात अशी शुभ रेषा असते, त्यांचे वैवाहिक जीवनही सुखी राहते. यामध्ये बुध पर्वतावर करंगळीच्या खाली असलेल्या रेषा पाहून व्यक्तीच्या वैवाहिक जीवनाचा अंदाज लावला जाऊ शकतो. बुध पर्वतावर असलेल्या रेषा जितक्या स्पष्ट आणि स्वच्छ असतील तितका व्यक्तीला लग्नानंतर अधिक आनंद मिळतो आणि अशा लोकांनाच योग्य वयात संतती सुख मिळते.

​लग्नानंतर हातात येतो पैसा

भाग्यरेषा संपत्ती आणि चैनीशी संबंधित आहे. जर एखाद्याच्या हातातील मणिबंधातून भाग्यरेषा निघत असेल आणि शनी पर्वतावर गेली असेल तर तो धनसंपत्तीच्या दृष्टीने अतिशय विशेष योग मानला जातो. अशा लोकांना लग्नानंतर खूप पैसा मिळतो. अशा लोकांचे नशीब लग्नानंतरच बदलते.

​यशामागे जोडीदाराचा पाठिंबा

हस्तरेषाविज्ञानात, असे सांगण्यात आले आहे की अंगठ्यातून एखादी रेषा निघून बृहस्पती पर्वतावर गेली तर अशा लोकांचे नशीब लग्नानंतरही चमकते आणि त्यांच्या यशामागे जोडीदाराचा हात असतो. अशा लोकांच्या लग्नानंतर करिअरमध्ये अचानक वाढ होऊ लागते. ते त्यांच्या क्षेत्रात विशेष स्थान निर्माण करतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.