
Tej Police Times
भगवान काल भैरवाबद्दल असे म्हटले जाते की, कालभैरव माणसाच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशोब ठेवतो. सजीवांचे कल्याण करणाऱ्यांवर कालभैरवाची विशेष कृपा असते, तर वाईट कृत्ये करणाऱ्या आणि अनैतिक कृत्य करणाऱ्यांना तो शिक्षा देतो. असे मानले जाते की, कालभैरव अष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला खायला द्यावे. असे केल्याने कालभैरवासोबतच शनिदेवाची कृपाही प्राप्त होते आणि राहूचा अशुभ प्रभावही दूर होतो. कालभैरवाची उपासना केल्याने मनातील भीती नाहीशी होते आणि कोणत्याही प्रकारच्या वाईट नजरेचा प्रभाव नाहीसा होतो.
कालभैरव अष्टमीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करा आणि सकाळी स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान शंकरासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. मान्यतेनुसार रात्री काल भैरवाची पूजा केली जाते. कालभैरव अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी काल भैरव मंदिरात जाऊन प्रसादात जिलेबी, इमरती, उडीद डाळ, पान आणि नारळ अर्पण करावे तसेच तुमच्या सर्व चुकांची क्षमा मागावी. प्रसादाचा काही भाग काळ्या कुत्र्याला द्यावा.
या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने तुमच्यातील ग्रहांचे अडथळे दूर होतात आणि त्याचबरोबर कालभैरव देखील प्रसन्न होतात अशी मान्यता आहे.
या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी २१ बेलाच्या पानांवर चंदनाने ‘ऊॅं नमः शिवाय’ लिहावे. यानंतर मनात ‘ऊॅं’ चा उच्चार करताना भगवान शंकराला एक एक करून अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.