तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

kaal bhairav jayanti 2022 : काल भैरव जयंतीला हे उपाय करा,अशी आहे खास मान्यता

0 55

Edited by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Nov 2022, 9:44 am

बुधवार १६ नोव्हेंबर रोजी कालभैरव अष्टमी आहे. हा दिवस भगवान भैरव आणि त्यांच्या सर्व रूपांना समर्पित आहे. भगवान भैरव हे भगवान शंकराचे रूप मानले जाते, त्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व …

 

kaal bhairav jayanti 2022 : काल भैरव जयंतीला हे उपाय करा,अशी आहे खास मान्यता

हायलाइट्स:

  • कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी
  • भगवान भैरव आणि त्यांच्या सर्व रूपांना समर्पित
  • कालभैरव जयंतीचे महत्त्व
  • कालभैरव जयंती पूजा विधी
  • कालभैरवाची पूजा केल्याने अडथळे दूर होतात
आज बुधवार १६ नोव्हेंबर रोजी कालभैरव अष्टमी आहे. हा दिवस भगवान भैरव आणि त्यांच्या सर्व रूपांना समर्पित आहे. भगवान भैरव हे भगवान शंकराचे रूप मानले जाते, त्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते. भगवान शिवाचे रौद्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केल्याने भीती आणि नैराश्य दूर होते आणि कामातील अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे. असे म्हटले जाते की, भगवान शिवाच्या कोणत्याही मंदिरात पूजा केल्यानंतर भैरव मंदिरात जाणे अनिवार्य आहे. अन्यथा भगवान शंकराचे दर्शन अपूर्ण मानले जाते. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान शंकराने कालभैरवाचा रौद्र अवतार घेतला होता. म्हणून हा दिवस काल भैरव अष्टमी म्हणून साजरा केला जातो.

कालभैरव जयंतीचे महत्त्व

भगवान काल भैरवाबद्दल असे म्हटले जाते की, कालभैरव माणसाच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशोब ठेवतो. सजीवांचे कल्याण करणाऱ्यांवर कालभैरवाची विशेष कृपा असते, तर वाईट कृत्ये करणाऱ्या आणि अनैतिक कृत्य करणाऱ्यांना तो शिक्षा देतो. असे मानले जाते की, कालभैरव अष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला खायला द्यावे. असे केल्याने कालभैरवासोबतच शनिदेवाची कृपाही प्राप्त होते आणि राहूचा अशुभ प्रभावही दूर होतो. कालभैरवाची उपासना केल्याने मनातील भीती नाहीशी होते आणि कोणत्याही प्रकारच्या वाईट नजरेचा प्रभाव नाहीसा होतो.

अशा प्रकारे पूजा करा

कालभैरव अष्टमीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करा आणि सकाळी स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान शंकरासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. मान्यतेनुसार रात्री काल भैरवाची पूजा केली जाते. कालभैरव अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी काल भैरव मंदिरात जाऊन प्रसादात जिलेबी, इमरती, उडीद डाळ, पान आणि नारळ अर्पण करावे तसेच तुमच्या सर्व चुकांची क्षमा मागावी. प्रसादाचा काही भाग काळ्या कुत्र्याला द्यावा.

या उपायांनी भैरव बाबा प्रसन्न होतात

या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने तुमच्यातील ग्रहांचे अडथळे दूर होतात आणि त्याचबरोबर कालभैरव देखील प्रसन्न होतात अशी मान्यता आहे.

या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी २१ बेलाच्या पानांवर चंदनाने ‘ऊॅं नमः शिवाय’ लिहावे. यानंतर मनात ‘ऊॅं’ चा उच्चार करताना भगवान शंकराला एक एक करून अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.