
Tej Police Times
शुक्रवारी महिला आयोगाची एक बैठक झाली, त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘लग्नानंतर ज्या मुलींचा आपल्या मूळ कुटुंबीयांशी संपर्क तुटला आहे. त्यांची सध्या काय परिस्थिती आहे? तसेच आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन त्या एका व्यक्तीसोबत निघून गेल्या आहेत. ज्यामुळे आपल्या कुटुंबीयांकडे त्या तक्रारही करू शकत नाहीत. ज्या व्यक्तीसोबत त्या निघून गेल्या आहेत, त्या व्यक्तीला माहित आहे की, या मुलींना त्यांच्या कुटुंबीयांचे समर्थन नाही. त्यामुळे त्यांचे काय होते हे आपण श्रद्धा वालकर प्रकरणातून पाहिले आहे. अशा मुलींना मदत करता यावी म्हणून मी एक विशेष पथक नेमण्याचे निर्देश दिले आहेत’, असे लोढा यांनी सांगितले.
लव्ह जिहादमुळे तरुणी बेपत्ता होत असल्याची काही आकडेवारी, माहिती महिला आयोगाच्या बैठकीत तुमच्यासमोर मांडण्यात आली का, असा प्रश्न लोढा यांना विचारण्यात आला. त्यावर, ‘आकडेवारी नाही, मात्र अशी १० ते १२ प्रकरणे माझ्यासमोर आहेत. त्यातही असे काही झालेले असू शकते’, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
Recover your password.
A password will be e-mailed to you.