Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ज्यांनी द्वेष पसरवला ते पण आपलेच आहेत की… परिवर्तन नक्की होईल, राहुल गांधींना विश्वास

15

जळगाव जामोद : रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले चिमुरडे, हाती मेणबत्या घेऊन उद्याच्या प्रकाशमय भविष्याची त्यांच्या डोळ्यातली स्वप्ने, माता माऊल्यांचे राहुल गांधींना बघायला आसुललेले डोळे, तरुणांच्या आशादायी नजरा अशा भारलेल्या वातावरणात काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा महाराष्ट्रातील १४ दिवसांच्या प्रवासाचा शेवट झाला. “मला महाराष्ट्राने खूप प्रेम दिलं. आशीर्वाद दिला. हा अनुभव विसरण्याजोगा नाहीये. मी धन्य झालो”, अशा भावना व्यक्त करताना राहुल गांधी यांचा गळा खरोखर दाटून आला होता. भारत जोडो यात्रेने परिवर्तन नक्की घडेल, असा विश्वास व्यक्त करुन ज्यांनी द्वेष पसरवला ते पण आपलेच आहेत, त्यांच्याविना महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही, असे भावोद्गार राहुल गांधी काढले अन् वाणीला पूर्णविराम देऊन त्यांनी महाराष्ट्रातून रजा घेतली.

प्रेम, विश्वास आणि सामाजिक सौहार्दचा संदेश देणाऱ्या भारत जोडो यात्रेने ५ राज्यांतून सुमारे १,७०० किमी यात्रेचा प्रवास पूर्ण केला. गेली १४ दिवस भारत जोडो यात्रेचं आणि राहुल गांधींचं लोकांनी स्वागत केलं, त्यांना भरभरुन प्रेम दिलं. काल जळगाव जिल्ह्यातील जामोद तालुक्यातील निमखेडी गावात राहुल गांधी यांनी शेवटची कॉर्नर सभा घेतली. यावेळी त्यांनी अतिशय भावनिक भाषण करत उपस्थितांच्या काळजाला हात घातला. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस राहुल गांधी गुजरातच्या दौऱ्यावर असल्याने भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशच्या सीमेवरच थांबणार आहे.

तर आपल्याला आजोबांचा नाव घेण्याचा अधिकार नाही : उद्धव ठाकरे
राहुल गांधी म्हणाले, “गेली १४ दिवस महाराष्ट्राच्या जनतेने मला खूप प्रेम दिलं, आशीर्वाद दिला, विश्वास दिला. मी खरोखर भरुन पावलोय… महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला समाजसुधारकांचा देखील मोठा वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं साहस, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, महात्मा फुलेंचं शिक्षण या गोष्टी स्मृतीत ठेऊन आणि महाराष्ट्रवासियांचं प्रेम घेऊन मी पुढचा प्रवास करतोय. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेची समज, तरुणांची स्वप्न, माता-भगिनींचं दुःख हे सगळं तुम्ही मला सांगितलंत, दाखवलंत.. हे मी कधीच विसरणार नाही”

“प्रेम, विश्वास आणि सामाजिक सौहार्द टिकावा हा भारत जोडो यात्रेचा मु्ख्य उद्देश आहे. पण ज्यांनी द्वेष पसरवला ते पण आपलेच आहेत की.. या भारत जोडो यात्रेतून परिवर्तन नक्की होईल. देशाच्या विकासासाठी मी सतत संघर्ष करीत राहील”, अशा शब्दात महाराष्ट्राला आश्वस्त करुन आणि महाराष्ट्रवासियांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल राहुल गांधी यांनी आभार मानले आणि बुलंद ‘जय महाराष्ट्र’ची घोषणा देऊन त्यांनी आपल्या वाणीला पूर्णविराम देत महाराष्ट्राचा निरोप घेतला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.