तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

माझ्यावरही श्रद्धासारखी परिस्थिती ओढवली असती, स्वत:शीच लग्न करणाऱ्या अभिनेत्रीची धक्कादायक कहाणी

0 45

मुंबई: सध्या देशभरात श्रद्धा आणि आफताबच्या प्रकरणाची मोठी चर्चा आहे. आफताब पूनावाला याने त्याची लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करुन तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन जंगलात फेकले. साऊथ फिल्म आणि ‘दिया और बाती हम’ मालिकेतील फेम अभिनेत्री कनिष्का सोनी श्रद्धा वालकरच्या बातमीने खूप दु:खी झाली आहे. तिने एक व्हिडिओ बनवला आहे, ज्यामध्ये ती रडताना दिसते आहे. तिने सांगितलं की, अशा मानसिकतेच्या व्यक्तीच्या चुकीचे कृत्य तिनेही सहन केले आहे.

हेही वाचा -लाल सुटकेसमध्ये फेकलेल्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटली, जन्मदात्या बापानेच घेतला जीव, कारण…

कनिष्का सोनीची धक्कादायक माहिती

कनिष्का सोनीने या व्हिडिओत सांगितले की, ‘मी श्रद्धाच्या कथेशी खूप रिलेट करु शकते. मला आठवतं की त्या अभिनेत्याने मला प्रपोज करताना लग्नाबद्दही विचारलं होतं. जेव्हा मी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा मला त्याचा रागीट, हिंसक स्वभाव आणि मद्यपानाच्या सवयी सहन कराव्या लागल्या. लग्नानंतर कदाचित सुधारणा होईल असे वाटायचे. मी बहुतेक वेळ त्याच्या घरी जात असे. तो मला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सांगायचा. मात्र, मी जिथून येते तिथे या सर्व गोष्टींना परवानगी नाही आणि मी स्वतः लिव्ह-इन रिलेशनशिपच्या बाजूने कधीच नव्हते’.

‘मी बहुतेक वेळा त्याच्याच घरी राहायची, कारण मला आमचं लग्न होईल अशी आशा होती. पण, एके दिवशी मी त्याला विचारलं आपण लग्न कधी करणार. मी त्याच्यासोबत राहत होती कारण त्याने लवकरच लग्न करणार असं सांगितलं होतं. त्याच्यासोबत मी अनेक स्वप्नं बघितली होती. माझ्या प्रश्नावर त्याला राग आला आणि त्या रात्री त्याने मला खूप मारहाण केली. तो मला केव्हाही मारून टाकेल, अशी भीती त्यावेळी मनात होती. त्याच रात्री मी माझे सामान घेऊन त्याच्या घरातून पळून गेले. प्रेमातल्या मुलांचं हे हिंसक रूप मी पाहिलं आहे, असंही तिने सांगितलं.

हेही वाचा -IND VS NZ: वर्ल्ड कपच्या पराभवातून धडा घेतला, रोहितने केलेल्या चुका हार्दिक पंड्याने सुधारल्या…

तोपर्यंत निर्णय घेऊ नका, कनिष्काचा मुलींना सल्ला

‘मला वाटतं की आपल्या देशातील मुली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जातात कारण त्यांना त्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं असतं. टाइमपाससाठी ती लिव्ह इनसारखा मोठा निर्णय घेणार नाही. आपल्या देशातील वातावरणामुळे याचा केवळ वाईट अर्थ काढला जात आहे. मी लिव्ह-इनवर मुलींनाही हाच सल्ला देऊ इच्छितो की वातावरण बदलले असले तरी जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखत नाही तोपर्यंत हा निर्णय घेऊ नका. अशा वाईट मानसिकतेच्या व्यक्तीशी लग्न करण्यापेक्षा मुलींनी एकटं राहून आपले आयुष्य जगलेलं बरं, असे अभिनेत्रीचे म्हणणे आहे.

मी ढकललं नसतं तर ती महिला पूर्णपणे माझ्या अंगावर आली असती; आव्हाडांचा दावा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.