
Tej Police Times
बेळगाव कारवार निपाणी भालकी बिदर महाराष्ट्रात समाविष्य करण्यासाठी गेली अनेक वर्ष लढा सुरु आहे. या लढ्यात महाराष्ट्राचं सातत्य राहिलं आहे. मी काल बोम्मईंचं जतबाबत विधान ऐकलं. जर तिकडचं सरकार बेळगाव कारवार निपाणी हा सगळा परिसर आपल्याला सोडायला तयार असतील तर त्यांना काय काय देता येईल, यावर चर्चा करणं शक्य होईल, असं म्हणत सीमावादावर पवार यांनी भाष्य केलं.
राज्यातील एकही गाव बाहेर जाणार नाही
‘सांगलीच्या जत तालुक्यातील जी ४० गावे कर्नाटकात जाणार म्हणतात, ती जुनी मागणी आहे. आता परिस्थिती बदलली आहे. सीमाभागातील गावांत राज्य सरकारने अनेक योजना आणि सवलती लागू केल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी अगर कोणत्याही कारणाने राज्यातील एकही गाव बाहेर जाणार नाही. आमच्या सरकारची ती जबाबदारी आहे,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी अचानक शिर्डीला येऊन साई समाधीचे सपत्नीक दर्शन घेतले. या वेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न न्यायालयात आहे. मात्र, हा प्रश्न समोपचाराने सुटावा, अशीच आमची इच्छा आहे. यासाठी बैठकाही झाल्या आहेत. केंद्र सरकारनेही यासाठी समोपचाराची भूमिका घ्यावी. त्या वेळी दुष्काळी परिस्थिती होती, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील गावांची ती मागणी होती. आता तेथे पाणी योजनांसह इतरही सरकारी योजनांची प्रभावी अंमलबाजवणी सुरू झाली आहे.’ दरम्यान, गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आम्ही जाणारच आहोत,’ असेही शिंदे म्हणाले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.