
Tej Police Times
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ही शक्कल एकट्या राज्यपालांच्या काळ्या टोपीतून आलेली नाही. त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागील मेंदू कोण आहे, हे शोधण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील आदर्शांचा हळुवारपणे अपमान केला जात आहे. मागे भगतसिंह कोश्यारी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलले होते. सातत्याने अपमान करून महाराष्ट्राच्या रक्तात भिनलेले आदर्श नष्ट करायचे. मग भाजपच्या काही भाकड नेत्याची नवे आदर्श म्हणून जनतेच्या मनात प्रतिमा बिंबवण्याची चाल खेळली जात आहे. त्याला विरोध झाला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना पदमुक्त करण्याची मागणीही केली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीला केंद्र सरकारकडून नेमका कसा प्रतिसाद दिला जातो आणि खरंच राज्यपालांकडून पदभार काढून घेतला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.