
Tej Police Times
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी समाचार घेतला. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी कोश्यारी यांच्यावर आसूड ओढले. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे नेमके आताच का बोलले, याचा विचार केला पाहिजे. खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पत्रकारपरिषदेत शरद पवार यांच्याविषयी प्रश्न उपस्थित केले. कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केले तेव्हा शरद पवार व्यासपीठावर उपस्थित होते. त्याबद्दल उदयनराजे यांनी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा शरद पवार यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. शरद पवार बोलल्यानंतर उद्धव ठाकरे यांना बोलावेच लागते. तसेच उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात पूर्वीपासून किती जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे आपल्याला माहिती आहे, अशी खोचक टिप्पणीही फडणवीस यांनी केली.
या मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांना भाजपमध्ये नव्याने आलेल्या नेत्यांविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु असलेल्या व्यक्तींना भाजपमध्ये कसा प्रवेश दिला जातो, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही सरसकट सर्व कलंकित नेत्यांना पक्षात प्रवेश देत नाही. अशा काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे, ही बाब मी कबूल करतो. निवडणुकीच्या राजकारणासाठी अशा काही तडजोडी कराव्या लागतात. पण संबंधित नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर त्यांची चौकशी कुठेही थांबलेली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.