तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Mumbai Water Cut : मुंबईत पुढचे २ दिवस पाण्याचा मेगाब्लॉक, या १० भागांत २९-३० तारखेला पाणीकपात

0 78

मुंबई : मुंबईकरांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, बीएमसीने मुंबईत २९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत २४ तास पाणीकपात जाहीर केली आहे. या २४ तासांत १० वॉर्डांमध्ये (Mumbai water cut) पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम भागात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

के पूर्व प्रभागात अंधेरी पूर्व, MIDC, SEEPZ, जोगेश्वरी पूर्व आणि इतर उपनगरांचा प्रमुख भाग समाविष्ट आहे. गुंदवली, नेहरू नगर आणि आझाद नगर भागात २९ नोव्हेंबरला पाणीकपात होणार आहे. आनंद नगर, समर्थ नगर आणि शेर-ए-पंजाब भागात ३० नोव्हेंबरला पाणी पुरवठ्यात कपात होणार आहे. मात्र, उर्वरित भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती आहे.

मुंबई-ठाणे वाहतूक कोंडींवर पर्याय सापडला, ‘या’ मार्गावर बांधणार U आकाराचा उड्डाणपूल
ओशिवरा, लोखंडवाला, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि जुहू मेट्रो भागात २९ आणि ३० नोव्हेंबरला पाणीटंचाई जाणवणार आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पाणीपुरवठ्यात कपात करताना कूपर हॉस्पिटलला पाणीपुरवठा करण्यासाठी बीएमसीच्या टँकरचा वापर केला जाईल.

विवाहित जोडप्यांसाठी आनंदाची बातमी, सरकार महिन्याला देईल १८,५००; आताच करा हे काम

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.