Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

३८ हजार नवउद्योजकांचा परतावा रखडला,अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कारभारावर सेनेचं बोट

13

कोल्हापूर : राज्यातील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने मराठा समाजातील नवउद्योजकांना दिल्या जाणाऱ्या व्याजाच्या परताव्याला ब्रेक लागला आहे. राज्यभरातील ३८ हजार नवउद्योजक या परताव्याच्या प्रतीक्षेत असून ती मिळत नसल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

राज्यातील मराठा समाजातील युवकांना उद्योग सुरू करता यावेत म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कर्जाच्या व्याजाचा परतावा दिला जातो. सरकार व्याज भरत असल्याने अनेकानी कर्ज काढून उद्योग सुरू केले. पण जून महिन्यापासून तांत्रिक कारण पुढे करत महामंडळ परतावास देण्यास टाळत आहे. यामध्ये तब्बल ३८ हजार नव उद्योजकांचा समावेश आहे.

Navi Mumbai : नवी मुंबईतील मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळ भीषण आग, ४२ दुचाकी जळून खाक

मराठा समाजाला उद्योगांमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आली. पण या बिनव्याजी कर्ज योजनेत व्याज परतावा देण्यास टाळाटाळ होत असल्याने अनेक तरुण अडचणीत आले आहेत. या महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संजय पवार यांनी याबाबत कोल्हापुरात आवाज उठवला आहे. केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच साडेतीन हजार लाभार्थी आहेत. राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात दोन ते तीन हजारावर युवकांनी या योजनेचा लाभ घेतला. पण प्रत्यक्षात व्याज परतावा सहा महिन्यापासून न मिळाल्याने ते अडचणीत आले आहेत.

गेल्या वेळी फक्त वॉर्निंग, दुसऱ्यांदा वसंत तात्यांनी उघड उघड सांगितलं, राज ठाकरेंनाही इशारा!

पवार यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, अवधूत साळुंखे यांच्यासह अनेकांनी सोमवारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तरुणांच्या व्यथा मांडल्या. तातडीने परतावा न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संजय पवार यांनी यापूर्वी महाविकास आघाडी सरकार असताना व्याज परतावा व्यवस्थित दिला जात होता. पण नवीन सरकार आल्यापासून मराठा समाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. व्याज परतावा देण्यासाठी सरकार पाठपुरावा करत नाही. त्याचा फटका मात्र तरुणांना बसत आहे, असं म्हटलं.

आकडेवारी

महाराष्ट्र मंजूर प्रकरण – ५२४०७

बँक कर्ज -३४९९ कोटी

व्याज परतावा – ३०७ कोटी

प्रलंबित क्लेम – १ जून पासून आज अखेर ३८०००

कोल्हापुर प्रलंबित क्लेम – १ जून पासून आजअखेर ३,५१०

उदयनराजेंच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्यात, देवेंद्र फडणवीसांचं राज्यपालांबाबत सूचक वक्तव्य

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.