
Tej Police Times
सदाभाऊ खोत म्हणाले, “वरच्या सभागृहामध्ये आ. गोपीचंद पडळकर आणि मी स्वत: तसेच खालच्या सभागृहामध्ये आ. बच्चू कडू, आ. अभिमन्यू पवार यांनी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न कायम उचलून धरले. बोगस क्रीडा प्रमाणपत्रांचा प्रश्न गोपीचंद पडळकरांनी लावून धरला होता. आम्ही सगळे नेते तुमच्या बरोबर आहोत, याचं कारण म्हणजे तुम्ही सगळी मुलं गावखेड्यातील आहे, गावगाड्यातील आहेत. तुमचे आईबाप शेता-मातीत राबून तुम्हाला इकडे पैसे पाठवत असतात आणि तुम्हीही रात्रीचा दिवस करुन मेहनत घेत असतात. तुम्हाला विशेष सूचना आहे की तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी राज्यस्तरीय अधिवेशन घ्या. कारण राज्यकर्त्यांना ‘डोक्यांची’ (मतदार) भीती असते. जिकडे जास्त डोकी असतात तिकडे राज्यकर्ते बोलायला लागतात”
पुढे बोलताना खोत म्हणाले, “राज्यकर्ते जर बोलायचे असतील तर ज्ञानेश्वरांसारखं रेड्यांच्या पाठीवर हात ठेवावा लागेल. राज्यकर्ते ही रेड्यांचीच अवलाद आहेत. कारण त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय ते वेद बोलत नाहीत. म्हणून त्यांना डोकी (मतदार) जास्त दिसली तर तुम्हाला नको असलेलं देखील ते बोलून जातात. शेवटी संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून आपल्याला आपले प्रश्न सोडवून घ्यावे लागतील”
Recover your password.
A password will be e-mailed to you.