तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

गटार साफ करताना दोन कामगारांचा मृत्यू; तिसऱ्याची मृत्यूशी झुंज

0 39

जुईनगर: नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीमधील गटार साफ करताना उग्र वासाने दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर तिसरा कामगार मृत्यूच्या दारात झुंज देत आहे. मयत झालेले दोन्ही कामगार हे बीट कोईन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमधील असून मयत झालेल्या व्यक्तींची नावे ही संदीप हांबे आणि विजय हे झारखंड आहेत. तर मृत्यूच्या दारात झुंज देत असलेला सोनोत हादसा असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. नवी मुंबई एमआयडीसीतील रबाळे भागात गटार तुंबले होते. त्यामुळे त्याच्या साफसफाईचे काम बिटकॉन ऑफ इंडिया या कंपनीला देण्यात आले होते.

रबाळे प्रभागातील भूखंड क्रमांक डब्ल्यू ३१० येथे प्रोफॅब इंजिनियरिंग प्रा.लि. कंपनीसमोरील गटार चेंबर उघडून काम सुरु करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात गाळ आणि लिचड साठल्याचे लक्षात येताच, त्याची साफसफाई करण्यासाठी विजय झाडखंड, संदीप हंबे आणि विजय हॉदसा हे तिघे जण आतमध्ये उतरले असता रासायनिक उग्र वासामुळे दोघांचा गुदमरून मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

वाचा-इंग्लंडने पाकिस्तानवर फक्त विजय मिळवला नाही तर केलंत ५ वर्ल्ड रेकॉर्ड; रावळपिंडी टेस्ट कधीच विसरली जाणार नाही

गाळ काढतानाच हे तिघेजण बेशुद्ध पडल्याचे समजतात त्यांना तातडीने नजीकच्या दवाखान्यात नेले. मात्र दोघे मृत्यूमुखी घोषित केले तर एक मृत्यूशी झुंज देत असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण प्रकरणामध्ये सुपरवायझर दत्तात्रय गिरीधारी याला अटक करण्यात आली असून ८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नवी मुंबईतील एमआयडीसीत अनेक कंपन्या अनधिकृत पद्धतीने रसायन मिश्रित पाणी नेहमीच गटारात सोडत असतात. ह्या सर्व गोष्टींकडे पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात त्यामुळेच ह्या दोन कामगारांचे जीव गमवावे लागले असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.