
Tej Police Times
याविषयी चर्चा करण्यासाठी विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन करावा, अशी सूचना महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने केली होती. तशी स्थापना सरकारने याआधी केली होती. पण त्या बैठकांना संबंधित घटकांचे प्रतिनिधी उपस्थितच राहत नसल्याने मुंबईत वीज आणण्यासाठीच्या यंत्रणेबाबत चर्चा होत नसल्याचे गंभीर निरीक्षण या शासन निर्णयात नोंदविण्यात आले आहे. यासाठीच आता नवीन समितीची स्थापना करण्यात आली असून त्यात जवळपास २० नियमित व १३ निमंत्रित सदस्य असतील.
या समितीची बैठक दर तीन महिन्यांनी होणार आहे. त्यामध्ये मुंबई महानगर व उपनगरातील वीज पारेषण व वितरण स्थिती बळकट करणे, नवीन वीज प्रकल्प शक्य नसल्याने पारेषण प्रणालीतून एकगठ्ठा वीज आणणे, उपकेंद्र उभारणीसाठी विविध सरकारी विभागांच्या जागांचा विचार करणे, प्रसंगी भूमिगत उपकेंद्र उभे करणे तसेच वीज पारेषण वाहिन्यांसाठी विविध संबंधित विभागांशी चर्चा करणे अशी प्रमुख कार्ये या समितीला करायची आहेत.
निर्णय जलद होतील
विशेष समितीची स्थापना मुंबईच्या वीज जाळ्यासाठी अत्यावश्यक होती. यामुळे भविष्यात मुंबईत अतिरिक्त वीज आणण्यासाठीची यंत्रणा सक्षम करण्यासाठीचे निर्णय जलद होतील. सर्व संबंधित विभागांशी निगडित अडथळे दूर करण्यास मदत होईल.
डॉ. दिनेश वाघमारे
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महापारेषण
Recover your password.
A password will be e-mailed to you.