
Tej Police Times
PM मोदींनी का टाकली एकनाथ शिंदेंच्या पाठीवर कौतुकाची थाप? राऊतांचा खळबळजनक दावा
मुंबईहून जळगावच्या दिशेने निघालेल्या मालवाहू वाहनाला आग लागल्याने मुंबई आग्रा महामार्गावर एकच खळबळ उडाली होती. केबिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने कंटेनरच्या समोरील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लागल्याबरोबर काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने कंटेनरची संपूर्ण केबिन जळून खाक झालेली आहे.
याआधी अनेक वेळा चालत्या वाहनांना आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभाग तसेच पोलिसांकडून वेळोवेळी वाहने तपासून आणि नादुरुस्त वाहने न वापरण्याचे आवाहन करून देखील वाहनाचे चालक-मालक या सूचनांकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे अशा घटनांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वाहनांची खात्री करूनच वाहने चालवावीत, असे आवाहन पुन्हा करण्यात आले आहे.
महिला संघाने करून दाखवले,आता पुरुषांची वेळ; रोहित आणि कंपनी कधी करणार अशी कमाल
Recover your password.
A password will be e-mailed to you.