
Tej Police Times
तांबे यांच्या सिटीझनविल’या मराठीत अनुवादीत पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम अलीकडेच मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी उपस्थित असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांना उद्देशून फडणवीस म्हणाले होते, “बाळासाहेब थोरात तुमच्याकडे माझी एक तक्रार आहे. सत्यजीत सारखे नेते, तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? सत्यजीतला जास्त दिवस बाहेर ठेऊ नका. नाहीतर आमची नजर त्यांच्यावर आहे. कारण, चांगली माणसे जमाच करायची असतात,” असे फडणवीस म्हणाले होते. तेव्हापासून तांबे यांना भाजपच्या या ऑफरची चर्चा होती.
आज नगरमध्ये तांबे याच पुस्तकाच्या निमित्ताने पत्रकारांसमोर आले होते. त्यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेत तांबे यांनी आपल्या पुढील वाटचालीची माहिती दिली. ‘सिटीझनविल’ या पुस्तकत लोकसहभागातून शहर विकासाचा मुद्दा मांडलेला आहे. त्या अनुषंगाने तांबे म्हणाले की, आता पुस्तक लिहून थांबायचे नाही. आतापर्यंतचे राजकारण आणि या पुस्काकाचे लेखन या निमित्ताने या क्षेत्रातील बऱ्याच त्रुटी आणि नेमके कोठे काम केले पाहिजे, ते लक्षात आले आहे. त्यामुळे आमच्या जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून आता राजकीय साक्षरता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी नागरिक शास्त्राच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांपासूनच प्रबोधन मोहीम सुरू करणार आहोत. यासाठी आपण स्वत: राज्यभर दौरे करणार आहोत.
शहरांच्या विकासासाठी ठिकठिकाणी राजकारण विहरित दबावगट तयार झाले पाहिजे. यासाठी पक्षविरहित तरुणांना जोडले जाण्याची गरज आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार होऊ पाहत आहे. त्यामुळे तरुण वर्ग व्यवस्थेवर आणि पर्यायाने राजकारणावर नाराज आहे. ती नाराजी दूर करून त्यांच्या मनात सकारात्मकता निर्माण करावी लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणताही राजकीय पक्ष हे काम प्रभावीपणे करू शकणार नाही, त्यामुळे राजकारण विरहित चळवळच हवी, अले ते म्हणाले.
हेही वाचा : संजय राऊतांच्या निकटवर्तीयाची पक्षातून हकालपट्टी, उद्धव ठाकरेंच्या आदेशाने कारवाई
भाजपच्या अप्रत्यक्ष ऑफरबद्दल थेट उत्तर देणे त्यांनी टाळले. मात्र, अशी विधाने होतच असतात. त्यावर आताच गांभीर्याने विचार केलेला नाही. काम करणाऱ्याला योग्य व्यासपीठ हवेच असते. त्याशिवाय कामाला गती देता येत नाही. अर्थात यासाठी मी लगेच भाजपमध्ये जाणार आहे, असेही नाही. माझा जन्म आणि राजकीय प्रवास ज्या विचारांत झाला आहे, तो सोडून काम करणे अवघड होऊ जाईल, याचाही विचार करावा लागणार आहे, असेही तांबे म्हणाले.
हेही वाचा : ऑफर शिंदे गटाची, पण प्रवेश भाजपात; फडणवीसांनी भिडू हेरला, राजेश टोपेंचंही टेन्शन वाढवलं
Recover your password.
A password will be e-mailed to you.