
Tej Police Times
भेदक नजर आणि रागाने लालबुंद चेहरा, ‘निर्लज्जपणाचा कळस’ म्हणत अजितदादा अब्दुल सत्तारांवर तुटून पडले!
या भीषण अपघातात यमुनाबाई गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघेजण गंभीर जखमी झालेत. भीषण अपघात झाल्याचे पाहून ट्रक चालक फरार झाला. या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. मात्र, मृत आणि जखमी गाडीतच अडकले होते. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने वाहने वेगवेगळी केली व अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. जखमींना चाळीसगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
ऑट्रम घाटात नेहमीच वाहनांची कोंडी होते. एखादे वाहन नादुरुस्त झाले की वाहनांची भलीमोठी गर्दी या घाटात होते. त्यामुळे वाहतुकीचे नियमन करताना पोलिसांच्या नाकी नऊ येतात. त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. भुयारी मार्ग व्हावा यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले होते. मात्र ,भुयारी मार्ग होत नसल्याने या मार्गांवर वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
सतत मोबाईलवर खेळतो, आई रागावली; १० वर्षीय मुलाने खोलीचं दार आतून बंद केलं अन्…
Recover your password.
A password will be e-mailed to you.