तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

भारतीयांना करोनाचा धोका कमी, तरीही काळजी का घ्यावी?; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

0 34

Mansi Kshirsagar | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 27 Dec 2022, 6:40 am

सर्वसामान्यांमध्ये आता उत्तम सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधात्मक उपायासंबधी नियम का पाळाव्याते, काळजी का घ्यावी, असा प्रश्न विचारला जातो. त्यावर तज्ज्ञांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले आहे.

 

भारतीयांना करोनाचा धोका कमी, तरीही काळजी का घ्यावी?; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
भारतीयांना करोनाचा धोका कमी, तरीही काळजी का घ्यावी?; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबईः सर्वसामान्यांमध्ये आता उत्तम सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधात्मक उपायासंबधी नियम का पाळाव्याते, काळजी का घ्यावी, असा प्रश्न विचारला जातो. त्यावर तज्ज्ञांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले आहे.

करोनाचा संसर्ग अन्य देशांमध्ये वेगाने फैलावत आहे. करोनाचा ओमायक्रॉन एक्सबीबी तसेच बीएफ ७चा संसर्ग वाढता आहे. अशा परिस्थितीमध्ये विषाणूच्या मूळ वर्तनामध्ये जनुकीय बदल होण्याची शक्यता वाढते. हे बदल खूप व्यापक असतील तर त्यामुळे गंभीर आजार निर्माण करणाऱ्या विषाणूच्या फैलावामध्ये होऊ शकते. त्याचा आत्ता वैद्यकीय अंदाज व्यक्त करणे शक्य नाही. त्यामुळे चीन, जपान, अमेरिका, कोरिया या देशांतून येणाऱ्यांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी व्हायला हवी. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या रूग्णांना विलगीकरणामध्ये ठेवणे व त्यांना प्रादुर्भाव करणारा विषाणू संसर्ग कोणत्या प्रकारचा आहे याचे प्रयोगशाळेमध्ये विश्लेषण करणे गरजेचे आहे. सध्या रुग्णसंख्या कमी असताना मास्क वापरण्याची गरज नाही मात्र अधिकाधिक लोकांनी बू्स्टर मात्रा घ्यायला हवी याकडे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. माधव साठे यांनी लक्ष वेधले आहे.

रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे मोफत मिळूनही लसीची तिसरी मात्रा घेण्यात आलेली नाही त्यामुळे हा साठा पडून राहिला किंवा फुकट गेला. आता फार मोजक्या ठिकाणी मात्रा उपलब्ध आहेत. एक्सबीबी या ओमायक्रॉन विषाणूच्या उत्परावर्तित स्वरूपाच्या संसर्गाने बाधित झालेल्या रुग्णांचे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये नमुने आढळले होते. मात्र त्यानंतरही राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. या विषाणूची संसर्गक्षमता किती आहे यावर फैलावाचा वेग ठरेल. ही संसर्गक्षमता अधिक असल्यास लागण होण्याची शक्यताही अधिक असेल त्यामुळे करोना प्रतिबंधक वर्तन प्रत्येकाने पाळायला असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.