
Tej Police Times
दोनदा कर्नाटकच्या निर्णयाविरुद्ध निषेध ठराव
म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आलेला महाराष्ट्राचा सीमाभाग येत्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची केंद्र सरकारला विनंती करणारा ठराव ५ एप्रिल १९६६ रोजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मांडला होता. १६ डिसेंबर २०११ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटक सरकारने बेळगाव महानगरपालिका अकारण व भाषिक द्वेषातून बरखास्त करणे या विषयावर निषेध ठराव आणला होता. तसेच १२ जुलै २०१२ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटक सरकारने बेळगाव महानगरपालिकेची बरखास्ती रद्द करून ही महानगरपालिका पुनर्स्थापित करण्याचा ठराव मांडला होता.
तेव्हादेखील झाली होती समिती
म्हैसूर आणि महाराष्ट्र सीमानिश्चितीसाठी दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आली होती. सध्या सुरू असलेला वाद मिटविण्यासाठीसुद्धा अशीच दोन्हीकडील मंत्र्यांचा समावेश असलेली महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.