
Tej Police Times
प्री-युनिव्हर्सिटी कोर्समध्ये नापास झाल्यानंतर मुलीने कॉलेज सोडलं होतं. तर, मुलानेही कॉलेजला जाणं बंद केलं होतं. तो कॅब ड्रायव्हर म्हणून काम करत होता. अनेक वर्षांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांना लग्न करायचे होते.
वाचाः ओमिक्रॉनच्या सर्वात धोकादायक व्हेरियंटची भारतात एन्ट्री; ‘या’ राज्यात सापडला पहिला रुग्ण
मुलीचे वय लग्नासाठी योग्य नसल्याने त्याने ती १८ वर्षांची पूर्ण झाल्यावर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याने ती १८ वर्षांची पूर्ण होईपर्यंत वाट बघितली. मात्र, तो लग्नासाठी तो स्वतःच्या वयाची अट मात्र विसरला. लग्न करण्यासाठी मुलाचे वय २१ वर्ष असावे लागते. मात्र, मुलाचे वय २० वर्ष आणि तीन महिने होते. तरीही त्याने मुलीसोबत पळून जाऊन लग्न केलं आहे.
वाचाः अमरावतीत ‘लिव्ह इन’चा थरार, लग्न झाल्यासारखेच समज म्हणत त्याने केले असे काही की…
मुलीची मोठी बहिण आणि मुलाचे चार मित्र यांनी चार नोव्हेंबर २०२२मध्ये दोघांचे एका मंदिरात लग्न लावून दिले. त्यानंतर ते तामिळनाडूमध्ये निघून गेले आणि तिथेच राहू लागले, असं मुलीने म्हटलं आहे. मात्र, सरकारी वकिलांनी त्यांचं लग्न अवैध असल्याचं म्हटलं आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.