तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी साधला अंत्योदय योजनेच्या लाभार्थींशी संवाद

0 17

सातारा दि. ५: केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी फलटण तालुक्यातील कोळकी ग्रामपंचायत येथील रास्त भाव धान्य दुकानास भेट देऊन पाहणी केली. या वेळी श्री. मिश्रा यांनी अंत्योदय योजनेतून धान्य मिळणाऱ्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते, माजी मंत्री बाळा भेगडे, प्रशांत परिचारक, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव यांच्यासह रास्त भाव दुकानदार श्री. नांदले, अंत्योदय योजनेचे लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

रास्त भाव दुकानात मिळत असलेले धान्य, ई पॉस मशीन, शिधापत्रिका, धान्य नोंदवही याची पहाणी श्री. मिश्रा यांनी केली. तसेच लाभार्थींना नियमित व चांगले धान्य मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. लाभार्थींना धान्य मिळण्यात काही अडचणी आहेत का? या विषयी विचारणा करून चांगल्या पद्धतीने लाभ दिला जात असल्याबद्दल ही समाधान व्यक्त केले.

000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.