Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मध्यरात्री हॉटेल-घरं जेसीबीने पाडली, भावावरील आरोपांवर पडळकर म्हणतात, त्यांनी काही चुकीचं…

7

सांगली : मिरज शहरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या सहाय्याने पाडली, असा आरोप भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावावर केला जात आहे. ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीरपने जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने मिळकती पाडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर तोडण्यात आलेले गाळे बेकायदा होते, माझ्या भावानं काहीही चुकीचं काम केलेलं नाही, असं स्पष्टीकरण आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलं आहे.

सांगलीतील मिरज शहरात मध्यरात्रीच्या सुमारास दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीरपने जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने सात मिळकती पाडल्याचा दाव स्थानिक नागरिकांनी केला आहे.

रस्त्या शेजारील दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोअर, ट्रॅव्हल, ऑफिस, एक घर, पान शॉप अश्या सात मिळकती पाडण्यात आल्या आहेत. मध्यरात्री जेसीबीच्या सहाय्याने दुकानं आणि घरं पाडली आहेत. अनेक जणांच्या मदतीने जागेचा ताबा घेण्यासाठी पडळकर आले होते असा आरोप नागरिकांनी केला आहे.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ब्रह्मानंद पडळकर हे आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू आहेत. त्यांच्यासह १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

दरम्यान, तोडण्यात आलेले गाळे बेकायदा होते, माझ्या भावानं काहीही चुकीचं काम केलेलं नाही, असं स्पष्टीकरण आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलं आहे. १६ तारखेला (डिसेंबर) ब्रह्मानंद पडळकर यांनी एक नोटीस काढली होती, की २४ तासांच्या आत तुमच्या पद्धतीने अतिक्रमण काढून घ्या, महापालिकेने परवा रिमाइंड नोटीस पाठवली, की अतिक्रमण काढून घ्या, काल रात्री अतिक्रमण काढलं, असं पडळकर म्हणाले.

कुठलंही चुकीचं काम नाही. मुळात तिथे राहणारेच बेकायदेशीर होते. त्या गरीब लोकांचा या जागेशी कुठलाही संबंध नसताना, त्यांचं नाव नसताना, त्या लोकांना बेघर करायचं नाही, म्हणून म्हैसाळ रोडला घर बांधून दिली आहेत, असं पडळकर म्हणाले.

हेही वाचा : ..तर उद्धव आणि रश्मी ठाकरे हे संजय राऊतांना चप्पलेने मारतील; नारायण राणेंचा खळबळजनक दावा

मिरजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मार्गाचे काम सुरू आहे. त्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे काम पालिकेच्या वतीनं सुरू आहे. माझ्या भावाच्या नावावर जो प्लॉट आहे त्यावर अतिक्रमण झालं होतं ते आम्ही काढून घेतलं. उलट आम्ही महानगरपालिकेला आम्ही मदत केली आहे. आम्ही अतिक्रमण केलेल्या नागरिकांना सांगितलं की पालिकेची नोटीस आलीय, पण त्या नागरिकांनी अतिक्रमण काढून घेतली नाही, त्यामुळे आम्ही पालिकेला मदत म्हणून हे अतिक्रमण काढून घेतले, असं असताना पोलिसांनी कशा पद्धतीने गुन्हे दाखल केले हे सांगलीत गेल्यावर पाहिलं जाईल, असंही पडळकर म्हणाले.

हेही वाचा : बारा तासात राजीनामा द्या आणि लोकसभा लढवा, राऊतांच्या ‘त्या’ शब्दावरुन शिवतारे भडकले

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.