
Tej Police Times
“तुळस ऑक्सिजन देते आणि हवा शुद्ध ठेवते. म्हणूनच आपण ती आपल्या घरात ठेवतो. त्याचप्रमाणे, घराच्या दाराजवळ रांगोळी काढण्यामागेही एक शास्त्रीय कारण आहे. जेव्हा आपण रांगोळ्यांमध्ये रंग, स्वस्तिक, ‘गोपद्म’ (गाईच्या रूपातील लक्ष्मी), गदा शंख पाहतो तेव्हा माणसाच्या मनातील वाईट विचार नाहीसे होतात आणि ती व्यक्ती सकारात्मकतेने आपल्या घरात प्रवेश करते.” असा दावाही कांचन गडकरी यांनी केला.
कांचन गडकरी म्हणाल्या की नवीन पिढीला वैज्ञानिक दृष्टीकोनातून भारतीय संस्कृतीची माहिती दिली पाहिजे. “प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. ते शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध झाले आहे. नवीन पिढी प्रत्येक गोष्टीमागील विज्ञान आणि कारणे शोधते. त्यामुळे आपल्या नवीन पिढीला भारतीय संस्कृतीची माहिती व्हावी, असे वाटत असेल तर आपल्याला वैज्ञानिक पार्श्वभूमी देत समजावून सांगणे आवश्यक आहे” असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, पद्मश्रीने सन्मानित बीजमाता राहीबाई पोपेरे यांना भाषणादरम्यान अचानक थांबवल्याचा प्रकार घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी वेगळीच तऱ्हा पाहायला मिळाली. महिला विज्ञान काँग्रेसच्या संयोजकांनी लडाख आणि त्रिपुरासारख्या दूरदूरच्या भागांसह विविध क्षेत्रांतून आलेल्या महिला प्रतिनिधींना एकतर बोलण्याची संधी दिली नाही किंवा पुरेसा वेळ नाकारला. अगदी, शहरात आल्यापासून प्रत्येक वेळी जेवणासाठी सिव्हिल लाईन्समधील आमदार वसतिगृहापासून अमरावती रोडवरील कॅम्पसपर्यंत जाण्याची सक्ती केली जात असल्याचा दावाही महिला प्रतिनिधींनी केला.
हेही वाचा : मिसेस मुख्यमंत्र्यांच्या मैत्रिणीची मुलगी म्हणून एक कोटींचं बक्षीस? भाजप खासदाराचा सवाल
कारगिलहून एकट्याच आल्याचा दावा करणाऱ्या कारपेंटर फातिमा बानो म्हणाल्या की, जेव्हा त्यांनी त्यांच्या भाषणाच्या स्थळाची चौकशी केली तेव्हा आयोजकांनी त्यांना इतर उपक्रमांचा आनंद घेण्यास सांगितले. “खाओ पियो ऐश करो असं तो म्हणाला. मी तिकडे गेले नाही,” असं फातिमा म्हणाल्या. मी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. याकडे समाज आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मला माझ्या संघर्षाबद्दल बोलायचे होते, असे फातिमांनी सांगितले.
हेही वाचा : राऊतांनी उद्धव-रश्मीबद्दल जे मला सांगितलं, ते मी एक दिवस उद्धवला सांगणार : नारायण राणे
Recover your password.
A password will be e-mailed to you.