
Tej Police Times
पंतप्रधान मोदी हे अत्यंत चांगले व्यक्ती आहेत, त्यांचं महाराष्ट्रावर प्रेमही आहे. विनंती केली असती तर मोदींनी पुढची तारीख दिली असती. पण दावोस परिषदेची तारीख पुन्हा मिळणार नाही. शिंदे आणि फडणवीस पहिले राजकारण करतात आणि नंतर राज्याला प्राधान्य देतात. महाराष्ट्रातील गुंतवणुकीचा टक्का घसरत आहे, त्याकडे शिंदे-फडणवीसांनी लक्ष दिले पाहिजे. पंतप्रधान हे आपलेच आहेत, ते येत-जात असतात. पण गेलेली गुंतवणूक पुन्हा येत नाही. मोदी अवघ्या काही तासांसाठी मुंबईत येत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणासाठीच हा दौरा असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण दावोस परिषदेला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना त्यांनी सांगितले की, मी दावोसला जाणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिकडे जातील, असे त्यांनी सांगितले. त्याऐवजी देवेंद्र फडणवीस १६ आणि १७ जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थिती लावणार आहेत.
गेल्या काही काळात राज्यातील अनेक बडे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राजकीय संघर्ष रंगला होता. या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर टीका झाली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा दावोस परिषदेला न जाण्याचा निर्णय वादग्रस्त ठरु शकतो. देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री आहेत. त्यांना अर्थकारण आणि उद्योगासंबंधी चांगली जाण असल्यामुळे दावोसमधील उद्योगपतींशी वाटाघाटी करण्यात फडणवीस महत्त्वाची भूमिका बजावू शकले असते.
Recover your password.
A password will be e-mailed to you.