
Tej Police Times
‘सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरून भाजपचा पाठिंबा मागणे, हे सर्वकाही पूर्वनियोजित होते. या भागातील पदवीधर लोक अडाणी नाहीत. भाजपकडून लोकांना भय दाखवून घरे फोडण्याचे काम सुरु आहे. आज भाजपला या सगळ्याचा आनंद वाटत आहे. भाजपच्या प्रमुखांची वक्तव्ये पाहता त्यांना या सगळ्याचा आनंद वाटतोय. पण एक दिवस भाजपचे घर फुटेल तेव्हा त्यांना दु:ख कळेल’, असे नाना पटोले यांनी म्हटले.
ही निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय खेळ्या सुरू होत्या. त्यामुळे शेवटपर्यंत सगळीच अनिश्चिता होती. सर्व राजकारण सत्यजीत तांबे यांच्याभोवती फिरत होते. त्यानुसार शेवटच्या क्षणी नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. भाजप त्यांना पाठिंबा देऊन बिनविरोध निवडून आणू शकते. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी आपली सत्यजीत तांबे यांच्यावर नजर असल्याचे सांगितले होते. तरीही काँग्रेस पक्ष गाफील राहिला.
नाशिक पदवीधरमध्ये मोठा ट्विस्ट, मुलासाठी बापाची माघार, सत्यजीत तांबेंचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल!
सत्यजीत तांबे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. सत्यजीत तांबे यांच्या निर्णयामुळे पक्षीय पातळीवर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. केंद्रातही वजन असलेल्या थोरात यांना पक्षातील आणि त्यांच्याच मतदारसंघातील आणि तेही नातेवाईक असलेल्या कार्यकर्त्यांनी धक्का दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरात यांना या सगळ्याची अगोदरच कुणकुण लागली होती. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या एका बड्या नेत्याला फोन करुन सत्यजीत तांबे यांना उमेदवारी देऊ नका आणि त्यांना पक्षातही घेऊ नका, असे सांगितल्याची माहिती समोर येत आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.