
Tej Police Times
नाशिक जिल्ह्यातले साधारण ६५ हजार शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत. नाशिक जिल्ह्यात याविरुद्ध मोठा आक्रोश आहे. सरकारने नाशिक जिल्हा बँकेला राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे ‘ओटीएस’ करण्याचा आदेश द्यावा आणि त्यासाठी हस्तक्षेप करावा. तब्बल ६२ हजार शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्यात. या प्रमुख मागणीसाठी नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीतर्फे आज हजारो शेतकऱ्यांकडून शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगाव येथे बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार आहे.
पुण्यातील जनरल मॅनेजर तरुणीला वेश्या व्यवसाय करण्यास सांगितलं, बॉससह चौघा जणांवर गुन्हा
कसा असेल मोर्चाचा मार्ग?
जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी येथील खंडेराव मंदिर ते दिंडोरी पेठच्या शेतकऱ्यांचे सकाळी साडेआठ वाजता स्वतःच्या वाहनांनी प्रस्थान झालं. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता मंगरूळ फाटा, चांदवड टोलनाक्याजवळ निफाड, चांदवड, दिंडोरी, पेठ, सिन्नर या तालुक्यातील शेतकरी एकत्र मालेगावकडे वाहनांनी निघाले. त्यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टी, अनिल धनवट, ललित बहाळे, संदीप जगताप, अर्जुन तात्या बोराडे हे नेते आणि पदाधिकारी शेतकऱ्यांसोबत सहभागी होतील. काही वेळातच म्हणजे दुपारी साडेबारा वाजता मनमाड चौफुली, मालेगाव येथे सर्व जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घराकडे कूच करणार आहेत.
दरम्यान, या आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते अनिल धनवट, ललित बहाळे, सीमा नरोडेदेखील सहभागी होतील. या आंदोलनाची सुरुवात कृती समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना यांनी केली असली, तरी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांचा पाठिंबा आंदोलनास मिळत असल्याची माहिती स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.
Recover your password.
A password will be e-mailed to you.