
Tej Police Times
यावेळी बोलताना सुधीर तांबे म्हणाले की, मी पुन्हा एकदा सांगतो मी असो अथवा सत्यजीत असो आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. ठीक आहे राजकारण असतं, राजकारणात काही डावपेच चालू राहतात, आपण पाहिले की भगवान श्रीकृष्णाने सुद्धा महाभारतात इकडची काडी तिकडे केली त्यामुळे ते जोडलं नाही. त्यामुळे ते चिटकलं नाही. डावपेच हा राजकारणाचा भाग असतो. आपल्याला काही गोष्टी अचानक पणे घडल्याचं वाटतं. परंतु, त्या ठिकाणी आपण काहीही चुकीचं केलेलं नाही. आपण आणि सत्यजीत ने काहीही चुकीचं केलेलं नसल्याचे म्हणत, मतदारांच्या अपेक्षांवर आपण पूर्ण उतरणार असल्याची ग्वाही यावेळी सुधीर तांबे यांनी दिली.
सुधीर तांबे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले असून, दुसरीकडे काँग्रेस पक्षाने केलेल्या निलंबनानंतर देखील सुधीर तांबे यांनी धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याच्या विधानामुळे, काँग्रेस पक्षाच्या निलंबनानंतर देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुधीर तांबे यांच्या संपर्कात आहेत का? हाच महत्त्वाचा प्रश्न यांच्या वक्तव्यामुळे उपस्थित झाला आहे.
आधी खोऱ्याने मारलं, नंतर ट्रॅक्टर अंगावर घातला, बॉडी घेवून तहसील कार्यालय गाठलं; जळगाव हादरलं!
नाना पटोले यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर लवकरच आपली राजकीय भूमिका देखील जाहीर करण्याचे स्पष्टीकरण सुधीर तांबे यांनी दिले आहे यामुळे या निवडणुकीतील पुढील कोणता अंक मतदारांना पाहायला मिळतो हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
तीन हजार वर्ष जुनी लाकडाची विहीर सापडली, आत उतरताच खजिना सापडला…
दरम्यान, काल नाना पटोले यांनी काँग्रेसचा पाठिंबा अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना असल्याचं म्हटलं होतं.
चार मुख्यमंत्री एकाच मंचावर,अखिलेश यादवांची उपस्थिती, लोकसभेसाठी भाजपसह काँग्रेसची चिंता वाढणार?
Recover your password.
A password will be e-mailed to you.