तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

सिंधुदुर्ग किल्ल्यावर केस ओढत तुफान हाणामारी; ५ रुपयांवरून वाद झाला अन् महिला भिडल्या, VIDEO व्हायरल

0 29

सिंधुदुर्ग : किल्ले सिंधुदुर्ग इथे पर्यटनासाठी आलेल्या सातारा येथील ४० जणांच्या महिला पर्यटक ग्रुपकडून दादागिरी, दमदाटी आणि अतिरेक केल्याचा प्रकार घडला आहे. किल्ले सिंधुदुर्ग येथे वायरी भुतनाथ ग्रामपंचायत माध्यमातून पर्यटन कर वसुली घेण्याच्या विषयावरून वाद भडकला. ५ रुपये कर भरणार नाही असं सांगत महिला पर्यटक ग्रुपने कर वसुली करणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची घटना घडली.

मालवणच्या समुद्रातील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग हा वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत असल्याने किल्ला दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून ग्रामपंचायतीकडून कर वसूल केला जातो. या कर वसुलीचा स्टॉल सिंधुदुर्ग किल्ल्यात असून त्यावर कंत्राटी पद्धतीने दोन महिला कर्मचारी कर वसुलीचं काम करतात. सातारा येथील पर्यटकांचा ग्रुप किल्ला दर्शनासाठी आला असताना स्टॉल वरील महिला कर्मचाऱ्यांनी कर भरण्यास सांगितलं.

हेही वाचा –
तस्करीच्या संशयाने कंटेनर थांबवला, आतून उघडा उघडाचा आवाज, दरवाजा उघडताच नागरीक चक्रावले

पर्यटकांनी कर भरण्यास नकार दिल्याने वाद भडकला. यावेळी त्या पर्यटकांनी दोन्ही कर्मचारी तरुणींना धक्काबुक्की करत मारहाण केली. महिला कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती ग्रामपंचायतीला कळवली. यानंतर किल्ल्यावरून ते पर्यटक व तरुणी होडीतून बंदर जेटी येथे परतल्यावर पुन्हा बंदर जेटी येथे दोन गटात वाद झाला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे आजी माजी पदाधिकारी यावेळी दाखल झाले होते.

अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचलं. यावेळी पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी प्राप्त तक्रारी नुसार गुन्हा दाखल केला जाईल असं सांगत कार्यवाई सुरू केली.

हेही वाचा – एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला, भीषण अपघात; रक्तबंबाळ अन् विव्हळणाऱ्या प्रवाशांच्या मदतीसाठी धावा

मात्र त्यानंतर दोन्ही गटात पोलीस ठाण्याबाहेर आपसात चर्चा झाली. महिला कर्मचाऱ्यांची माफी मागून तसंच त्या महिला कर्मचाऱ्यांच्या फोनचं झालेलं नुकसान भरून देण्याची तयारी पर्यटकांनी दाखवली. आमची चूक झाली. गैरसमजातून हा प्रकार घडला, आम्ही हात जोडून माफी मागतो असं पर्यटकांनी सांगितलं. अखेर महिला कर्मचारी आणि कुटुंबीय याबाबत सहमत झाले. त्यामुळे पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल न होता माफीनामा आणि नुकसान भरपाई या विषयानंतर वाद मिटला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.