
Tej Police Times
दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांना स्वच्छतागृह नसल्याने त्यांची कुचंबना होत आहे. यामुळे आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील महिला, संघटना एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला आहे. यावेळी महिलांच्या हातातील फलक हे लक्षवेधी ठरत होते. तर सर्व महिलांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात जाऊन महिलांची व्यथा मांडत हात जोडून महिलांसाठी स्वच्छतागृह उभा करावी, असे आवाहन महिलांनी केले आहे. शिवाय लवकरात लवकर मागणी पूर्ण न झाल्यास आज मूक मोर्चा काढला आहे, मात्र उद्या उग्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही महिलांनी यावेळी दिला आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतागृहाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी नवीन स्वच्छतागृह बांधण्यासाठी जुने स्वच्छतागृह पाडण्यात आले. मात्र गेल्या काही महिन्यापासून स्वच्छतागृहाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत पडून आहे. तर महिलांसाठी तात्पुरती सुविधा देखील येथे कोणतेही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
दुसऱ्या बाजूला परिसरातील हॉटेल व यात्री निवास मध्ये भाविकांकडून पैशांची लूट करत स्वच्छतागृह वापरण्यात येत असल्याचे देखील समोर आले आहे. तर अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतागृहासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने शासनासमोर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान मेन राजाराम मधील आणि परिसरातील अनेक शासकीय कार्यालय हे आता स्थलांतरित करण्यात येत असून त्या ठिकाणी भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी महिलांना सांगितले आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.