तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Pariksha Pe Charcha: पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिला यशस्वी होण्याचा मंत्र

0 74

Pariksha Pe Charcha:आज २७ जानेवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात देशभरातील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी काही विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी आणि परीक्षेदरम्यानच्या वेळेचे व्यवस्थापन याबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले हे जाणून घेऊया.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून ३८ लाख विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षेचा ताण टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मुलांना गुरुमंत्र दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘परीक्षा पे चर्चा’ ही माझीही परीक्षा आहे आणि देशातील करोडो विद्यार्थी माझी परीक्षा देत आहेत. मला ही परीक्षा देताना आनंद होतो. कुटुंबांना आपल्या मुलांकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, परंतु केवळ सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी असेल तर ते धोकादायक ठरते असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

राजकारणातही असतो दबाव

पीएम मोदी म्हणाले की, तुमच्याप्रमाणे आम्हालाही आमच्या राजकीय जीवनात अशा दबावाचा सामना करावा लागतो. निवडणुकीत कितीही चांगले निकाल लागले तरी नेहमीच चांगले परिणाम अपेक्षित असतात. काळजी करू नका, फक्त आरामशीर आणि आनंदी राहून तुमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. तुम्हीही तुमच्या उपक्रमाकडे लक्ष दिले तर तुम्हीही अशा संकटातून बाहेर पडाल, असे पंतप्रधान म्हणाले.

आपले ध्येय ओळखा

स्वतःमध्ये पहा आणि आत्मपरीक्षण करा, असे पंतप्रधान परीक्षा पे चर्चादरम्यान मोदी म्हणाले! तुम्ही तुमची क्षमता, तुमच्या आकांक्षा, तुमचे ध्येय ओळखले पाहिजे. आणि मग त्यांना तुमच्याकडून इतर लोकांच्या अपेक्षांनुसार संरेखित करण्याचा प्रयत्न करा.

वेळेचे व्यवस्थापन शिकणे महत्त्वाचे

केवळ परीक्षेसाठीच नव्हे तर जीवनातही वेळेच्या व्यवस्थापनाचे भान ठेवायला हवे, असे ते म्हणाले. वेळेवर कामे होत नसल्याने कामे रखडतात. काम करून कधीच थकायला होत नाही. काम करून समाधान मिळते, असे पंतप्रधान म्हणाले.

पीएम मोदी म्हणाले की, कष्टकरी मुलांना काळजी वाटते की, मी मेहनत करतो आणि काही लोक त्याचे क्रेडीट घेऊन जातात. मूल्यांमधील हा बदल समाजासाठी घातक आहे. पण आता आयुष्य बदलले आहे, जग बदलले आहे. आज प्रत्येक पावलावर परीक्षा द्यावी लागते. कॉपी करुन जीवन घडवता येत नाही असे पंतप्रधान म्हणाले.

Pariksha Pe Charcha: बहुतांश शाळांमध्ये थेट प्रक्षेपणाची सुविधा नाही,’परीक्षा पे चर्चा’ पाहायची कशी?
SSC HSC Exam: दहावी, बारावीच्या परीक्षार्थींवर असणार सीसीटीव्हीची नजर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.