Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जळगावात भूकंपाचा धक्का, घरं हादरली, भांडी पडली, नागरिकांनी घेतली घराबाहेर धाव

5

जळगावः जिल्‍ह्यातील भुसावळ शहर परिसरात आणि सावदा परिसरात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भुकंपाचे सौम्‍य धक्‍के बसले आहेत. यामुळे नागरीकांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी घाबरु नये, योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जळगाव जिल्‍ह्यातील भुसावळ व सावदा परिसरात सकाळी १० वाजून ३५ मिनिटांच्‍या सुमारास भुकंपाचे सौम्‍य धक्‍के जाणवले. या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल नोंदली गेली. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ शहरातील गडकरीनगर ग्रीन पार्क, विठ्ठलमंदिर वार्ड, शनि मंदिर वार्ड, वांजोळा रोड, बाजारपेठ परिसरातही दीड सेकंदापर्यंत हे भुकंपाचे धक्‍के बसल्‍याचे नागरीकांनी सांगितले.

वाचाः महाराष्ट्र हादरला! २३ वर्षांच्या तरुणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले, प्रेमसंबंधातून घरच्यांनीच संपवले

भुसावळ शहरातील श्रीरामनगर परिसरातील इमारतीतील नागरीक लगेचच बाहेर निघाले. तर राहुल नगरातील काही घरांमधील भांडी खाली पडल्‍याची माहिती समोर आली आहे. केशरनगरमध्‍ये देखील दरवाजे हलत असल्‍याने नागरीक घाबरले होते. यामुळे घाबरून नागरीक बराच वेळ घराच्‍या बाहेर थांबून होते. ज्‍या भागात भांडे पडले होते, त्या नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे

वाचाः पुण्यातील प्रसिद्ध स्पा सेंटरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवताच…
३.३ इतका रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा हा भूकंप होता. यात कुठलीही जीवित, अथवा वित्तहानी झालेली नाही, ज्या जीर्ण झालेल्या बिल्डिंग, इमारती घरे आहेत, ती रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहेत.

भुसावळ शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून आणखी तीव्रतेचा भूकंप येण्याची शक्यता असल्याने नागरिकांना घराबाहेर थांबण्याचे, आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे

वाचाः महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट; ‘या’ जिल्ह्यांवर आस्मानी संकट; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.