
Tej Police Times
वाचाः महाराष्ट्र हादरला! २३ वर्षांच्या तरुणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले, प्रेमसंबंधातून घरच्यांनीच संपवले
भुसावळ शहरातील श्रीरामनगर परिसरातील इमारतीतील नागरीक लगेचच बाहेर निघाले. तर राहुल नगरातील काही घरांमधील भांडी खाली पडल्याची माहिती समोर आली आहे. केशरनगरमध्ये देखील दरवाजे हलत असल्याने नागरीक घाबरले होते. यामुळे घाबरून नागरीक बराच वेळ घराच्या बाहेर थांबून होते. ज्या भागात भांडे पडले होते, त्या नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे
वाचाः पुण्यातील प्रसिद्ध स्पा सेंटरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवताच…
३.३ इतका रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा हा भूकंप होता. यात कुठलीही जीवित, अथवा वित्तहानी झालेली नाही, ज्या जीर्ण झालेल्या बिल्डिंग, इमारती घरे आहेत, ती रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहेत.
भुसावळ शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून आणखी तीव्रतेचा भूकंप येण्याची शक्यता असल्याने नागरिकांना घराबाहेर थांबण्याचे, आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे
वाचाः महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट; ‘या’ जिल्ह्यांवर आस्मानी संकट; वाचा हवामान विभागाचा अंदाज
Recover your password.
A password will be e-mailed to you.