
Tej Police Times
बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शकांच्या यादीत अनुराग यांचं नाव घेतलं जातं. अनुराग यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अभय देओल आणि सुशांत सिंग राजपूत यांच्याबद्दल खुलासे केले. अनुराग म्हणाले की, आपण केलेल्या चुकीची जाणीव व्हायला त्यांना दीड वर्ष लागलं. यामुळेच गेली दीड वर्ष ते सतत रागात असायचे. आजारी असायचे. मग त्यांनी शांतपणे विचार केल्यावर त्यांना कळलं की यामागचं कारण काय आहे. परंतु, आता खूप उशीर झालाय आणि त्यांच्याकडे कोणतंही फिल्टर नाहीये ज्यामुळे झालेल्या गोष्टी बदलता येतील. आता खूप काही बदललंय. जेव्हा त्यांना सुशांतच्या मृत्यूबद्दल कळलं तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं कारण त्यांना तीन आठवड्यांपूर्वीची गोष्ट आठवली की सुशांत त्यांच्याशी बोलण्याचा आणि भेटण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, त्यांनी नकार दिला. कारण ‘शुद्ध देसी रोमान्स’ म्हणावा तसा हिट गेला नव्हता. परंतु, आता माफी मागून काहीही उपयोग नाही.
सुशांतने परत फोन केला नाही
सुशांतने त्यांना कधीच परत बोलावलं नाही. अनुराग म्हणाले की त्याने नाराज न होता इतर कलाकारांसोबत ‘मुक्काबाज’ केला. अनुरागचा शेवटचा चित्रपट सायन्स फिक्शन मिस्ट्री थ्रिलर ‘दोबारा’ होता, ज्यामध्ये तापसी पन्नू आणि पावेल गुलाटी यांची भूमिका होती. पुढे त्यांचा अलाया एफ आणि नवोदित करण मेहता अभिनीत ‘डीजे मोहब्बत’ प्रदर्शित होणार आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.