
Tej Police Times
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये बिनसलं? Viral Video नंतर चर्चांना उधाण
नेहा मर्दानं २०१२मध्ये पटना इथं राहणारे व्यावसायिक आयुष्मान अग्रवाल यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर बाळ होत नसल्यानं त्यांनी टोकांचे टोमणे ऐकल्याचं तिनं सांगितलं. ईटाइम्स ला दिलेल्या एका मुलाखतीत तिनं तिच्या गरोदरपणाबद्दल आणि आधीचे दिवस यांवर गप्पा मारल्या.
नेहा म्हणाली की…
मी आई होणार हे जेव्हा मला समजलं, तेव्हा मी प्रचंड आनंदी होते.मी नेहमीच सांगत आलेय की, मला आई व्हायचंय, जसं मला नेहमीच लग्न करण्याची उत्सुकता होता. लग्नाच्या दहा वर्षांनंतर मी आई -बाबा होणार आहोत, त्यामुळं आम्ही खूप आनंदी आहोत. असं नाही की, दहा वर्षांत आम्ही बाळासाठी प्रयत्न केले नाही, आम्हाला बाळ नको होतं. पण तरी देखील लोक मला महात्वाकांक्षी ,हिला बाळ नकोय, असं बोलायचे, पण आज हे टोमणे ऐकल्यानंतर मी प्रेग्नंट असल्याचा आनंद जास्त आहे. असं नेहा म्हणतेय.
तो कसा दिसतो, धर्म कोणता बोलणाऱ्यांनो… शाहरुखवर जळणाऱ्यांसाठी हेमांगी कवीची झणझणीत पोस्ट
नातेवाई- शेजारी मला दिवस जात नाहीत, म्हणून वेगळ्याच नजरेने पाहायचे, जज करायाचे. पण तुम्हाला माहित असतं की, टोमणे मारणारे हे तुमच्या जवळचे नसतात.ते तुमच्या कुटुंबातील नसतात, त्यामुळं तुमच्याबद्दल त्यांना फार काही माहित नसतं. अशा लोकांनाही मी हसत हसत सामोरी गेले. कोणत्याही जोडप्याला असं प्रेशन द्यायला नको, तुम्हाला माहित नाही की, समोरचा कोणत्या परिस्थितीतून जातोय.
Recover your password.
A password will be e-mailed to you.