
Tej Police Times
पती व मुलीच्या निधनानंतर रघुवीर हा रंजना सोनवणे यांच्या जगण्याचा आधार होता. या एकुलत्या एक मुलाला शिकवून बँकेत अधिकारी बनवावं असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मातेला मात्र त्याच्याच अंत्ययात्रेत मंगल अक्षता टाकण्याची दुर्दैवी वेळ आली .
रघुवीर मनोज सोनवणे हा गेल्या अडीच महिन्यांपासून तो अंथरुणावर खिळून होता. शेंदुर्णी येथील शेठ राजमल ललवानी उच्च माध्यमिक विद्यालयात वाणिज्य शाखेत त्याने गेल्या वर्षी बारावी परीक्षेचा फॉर्म भरला होता. मात्र परीक्षेदरम्यानच तो उपचार घेत असल्याने त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. कोरोनाची लागण झाल्याचे कळताच पतीला वाचविण्यासाठी अल्पभूधारक रंजना सोनवणे यांनी शेती विकून उपचार केले. परंतु दुर्दैवाने पतीचे प्राण त्या वाचवू शकल्या नाहीत .
अंत्यविधीत मंगलाष्टकांचे स्वर… उपस्थितांचे मने हेलावली
मुलगी आणि पती वियोगाचे दुःख उराशी कवटाळून मुलगा रघुवीर यास बँकेत अधिकारी बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते .परंतु नियतीला ते मान्य नसेल म्हणून की काय आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास रघुवीरची प्राणज्योत मालवली. रंजना सोनवणे यांनी मुलगा रघुवीर याला बरे करण्यासाठी मोलमजुरी करून जळगाव, औरंगाबाद, मुंबई येथील दवाखान्यांमध्ये उपचार केले. मात्र त्यांना अपयश आले व त्याचा याच आजाराने जीव घेतला.
तरुण असल्याने मृत्यू पश्चात रघुवीरचे सुपारीशी लग्न लावण्यात आले. यावेळी टाहो फोडत आई रंजना सोनवणे यांनी भरल्या डोळ्यांनी अक्षता टाकल्या. अंत्ययात्रेतील मंगलाष्टकाचे स्वर कानी पडल्याने तसेच आईचा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावून गेल्याचं पहायला मिळालं. या घटनेने संपूर्ण जामनेर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.