Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पोटच्या मुलांची आठवण आली, प्रियकरासह गावात आली… अखेर पोलिसांनी गूढ उलगडलं

10

सोलापूर:मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आईने प्रियकराच्या मदतीने आपल्या दोन्ही लेकरांची चोरी केली होते. दोन्ही लेकरं अचानकपणे बेपत्ता झाल्याने वडील प्रकाश अण्णाप्पा कोळी यांनी मंद्रुप पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आईसह प्रियकराला ताब्यात घेतले. प्रियकराच्या मदतीने आपल्या दोन्ही बाळांना पळवले असल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली.दोन्ही मुलांसह आई सांगली येथे होती.सांगली पोलिसांच्या मदतीने व मंद्रुप पोलिसांच्या सतर्कतेने दोन्ही मुलं सुखरूप मिळाली.मंद्रुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही लेकरांना बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दोन्ही लेकरं अचानकपणे बेपत्ता

२८ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास प्रकाश अण्णाप्पा कोळी (वय वर्षे ४९,रा. औज मंद्रूप,तालुका दक्षिण सोलापुर ) यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार २७ जानेवारी रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा ८ वर्षांचा मुलगा आणि १० वर्षांची मुलगी प्रकाश कोली यांना डबा देण्यासाठी घरातून गेले ते परतलेच नव्हते. २८ जानेवारी रोजी दिवसभर त्यांचा गावात,नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु, ती न मिळून आल्याने मंद्रुप पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुलांना पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

सुरुवातीला पोलिसांनी दोन्ही लेकरं सुखरूप असल्याची खात्री केली

गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच सदर गुन्ह्याचा तपास मंद्रुप पोलीस ठाण्याचे सपोनि रवींद्र मांजरे यांनी स्वतःकडे घेऊन तात्काळ सदर मुलांच्या शोधाकरिता दोन पथके रवाना केली. एपीआय रवींद्र मांजरे यांनी तात्काळ औज गावात भेट देऊन गोपनीय व परिस्थितीची माहिती घेतली. मंद्रुप पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी संदीप काळे व दिनेश पवार यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदरची दोन्ही मुले ही त्यांच्या आईनेच लक्ष्मी प्रकाश कोळी हिने रात्री नेली होती. सपोनि मांजरे,उपअधीक्षक अमोल भारती यांनी फोन वरून सदर मुलीच्या आईसोबत बोलणी करून मुले सुरक्षित असल्याची खात्री केली.

सांगली पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले

सदर मुलांना ताब्यात घेण्यासाठी तात्काळ आईच्या मोबाईलच्या लोकेशनवर पीएसआय अमितकुमार करपे व पथक सांगली येथे रवाना झाले.पोलिसांनी सांगली येथील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना संपर्क करून आईच्या लोकेशनवर पोलीस पथक पाठविण्याची मागणी केली.सदर लोकेशनवर सांगली पोलीस दलातील पोलीस हवालदार वाघमोडे व पथक यांनी जाऊन मंद्रुप पोलिसांनी पुरवलेल्या माहितीप्रमाणे त्यांना ताब्यात घेतले.

भारताने वर्ल्डकप जिंकला, इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत विश्वचषकावर नाव कोरले

मुलांच्या आईला नोटीस देऊन सोडले तर प्रियकराची न्यायालयीन कोठडी रवाना

ह्या गुन्ह्यात मुलांच्या आईला मुले पळवून घेऊन जाण्यात मदत करणारा व्यक्ती शिवराज सुभाष भतगुणगी व आई लक्ष्मीला आरोपी करण्यात आले. आईला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.आईला मदत करणाऱ्या तिच्या प्रियकर व्यक्तीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.लक्ष्मी ही गेल्या सहा महिन्यांपासून प्रियकरा सोबत सांगली येथे राहत होती.मुलांची खूप आठवण येत असल्याने असे कृत्य केले असल्याची माहिती पोलिसांना दिली.

एक एक रुपयाचा हिशेब देणार, वेळ काढून विरोधकांची लफडी बाहेर काढणार, राजेंद्र राऊतांचा पलटवार

दोन्ही मुलं शोधून सुखरूप परत आणण्याची कामगिरी मंद्रुप पोलीस ठाण्याचे सपोनि रवींद्र मांजरे,पीएसआय अमितकुमार करपे,पोलीस हवालदार अंगद गिते,राहुल महिंद्रकर,प्रमोद असादे,मोहन मनसावले,पोलीस नाईक अविनाश पाटील,पोलीस अंमलदार संदीप काळे,दिनेश पवार,सागर चव्हाण,संजय कांबळे,महिला पोलीस शिपाई दिक्षिता दोडतले,चालक हनुमंत जाधव यांनी केली आहे.

भारताने विजयासह इतिहास रचला, आतापर्यंत जगात कोणालाही करता आली नव्हती अशी कामगिरी

मोठे कसेही वागले तरी आदर करावा लागतो; चंद्रकात खैरेंच्या बाजूला बसून संजय शिरसाटांची टोलेबाजी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.