
Tej Police Times
जीवे मारण्याची धमकी आणि १० कोटींची मागणी
नरेशच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यात आणि रम्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सतत भांडण होत आहे. त्यात आता नरेशने त्याच्या चौथ्या लग्नाची घोषणा केल्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. नरेश बाबूने दावा केला की रम्या त्याला सतत जीवे मारण्याची धमकी देत होती आणि १० कोटी रुपयांची मागणी करत होती. एवढंच नाही तर २०२२ मध्ये काही गुडांना तिने सुपारी देत त्याच्या घराची रेकीही करायला लावली होती. त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे तो कोर्टाकडे सातत्याने पोलीस संरक्षण मागत आहे.
त्यामुळेच राम्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला
नरेश बाबूने यावेळी रम्या रघुपतीपासून वेगळं होण्याचा निर्णय का घेतला याचं कारणही सांगितलं. नरेश बाबूने दावा केला की रम्याचे अनेक अफेअर होते. दोघे बराच काळ एकत्र राहत नव्हते. रम्या तिच्या राजकीय पार्श्वभूमीचा वापर करून नरेशला सतत धमकावते आणि जीवे मारण्याची धमकी देते. नरेशचं रम्याशी लग्न होण्याआधी दोन लग्न झाली आहेत. तिसरं लग्न रम्यासोबत झालं होतं आणि आता तो चौथं लग्न पवित्रा लोकेशसोबत करणार आहे. पवित्रा लोकेशचंही हे दुसरं लग्न असेल.
Recover your password.
A password will be e-mailed to you.