
Tej Police Times
मराठी नाही घाटी म्हणून हाक मारायचे
उर्मिलाने दिलेल्या मुलाखतीत ती म्हणालेली, ‘मला तेव्हा मराठी असं म्हटलं जायचंच नाही. ते लोक मला नीट हाकही मारत नसत. ते मला घाटी म्हणून हाक मारायचे. मराठी नाही तर घाटी लोकांना नीट हिंदी बोलता येत नाही असं म्हणायचे. मराठी लोकांच्या हिंदीला घाटीपणाचा वास येतो, हे काय घाटी कपडे घातलेत असं म्हटलं जायचं. बॉलिवूडमध्ये आजही काही ठिकाणी हीच परिस्थिती आहे याकडे कानाडोळा करून चालणार नाही. मी एक मराठी अभिनेत्री असल्याचा त्रास सहन केला आहे. मला अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या, अनेकदा मनस्ताप झाला. दुसऱ्यांच्या वागण्याचा त्रास झाला. अनेकदा हिणवलं गेलं. हा बॉलिवूडचा खरा चेहरा होता. इतकंच नाही तर बॉलिवूडमध्ये तेव्हाही नेपोटीझम होतं. मी त्यावेळी काही बोलले नाही पण आता बोलते.’
तेव्हाही होती घराणेशाही
उर्मिला पुढे म्हणाली, ‘१९९० च्या दशकात १५ ते १६ अभिनेत्री चित्रपटसृष्टीत आलेल्या. त्यातल्या १२ कुणा ना कुणाच्या नात्यातल्या होत्या. त्यामुळे घराणेशाही ही काही आज बॉलिवूडमध्ये आलेली नाही. ते तेव्हापासूनच सुरू आहे. प्रत्येक क्षेत्रात सुरू आहे.’ असं उर्मिला म्हणाली होती.
Recover your password.
A password will be e-mailed to you.