Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

डाव उलटला! अखेर आदिल खान बोलला आणि गप्प झाली राखी सावंत, म्हणाली- आता सर्वकाही ठीक

7

मुंबई: आईच्या निधनानंतर राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली असून यावेळीही तिने मीडियाशी बोलताना तिच्या लग्नाविषयी भाष्य केले. अभिनेत्रीने तिचे लग्न मोडत असल्याचे सांगितले. शिवाय अभिनेत्रीने तिचा दुसरा नवरा आदिल खान दुर्रानीवर फसवणुकीचा आरोप केला. या दोघांनी साधारण ८ महिन्यांपूर्वी लग्न केले होते. आता तिने असा दावा केला आहे की आदिलचे तीन मुलींसोबत प्रेमसंबंध असल्याने त्याने तिला लग्न लपवण्यास भाग पाडले.

दरम्यान पापाराझींशी बोलताना तिने त्या मुलीला इशाराही दिला, जिच्यासोबत आदिलचे अफेअर असल्याचे तिचे म्हणणे आहे. लवकरच पुरावा म्हणून व्हिडिओ आणि फोटो दाखवेन अशी धमकीही राखीने दिली होती. या सगळ्या प्रकाराबाबत आता आदिलने मौन सोडले असून त्याने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट टाकून संताप व्यक्त केला.

हे वाचा-नेव्हीमध्ये होते कियाराचे सासरे तर सिद्धार्थची सासू शिक्षिका, असं आहे मल्होत्रा-आडवाणी कुटुंब

राखीने सांगितले की बिग बॉस मराठीमध्ये असताना तिच्या नवऱ्याचे कोण्या मुलीसोबत अफेअर सुरू झाले. एवढेच नव्हे राखीने हेही सांगितले की आदिलने तिला एका रात्री असे सांगितले होते की जर तिने या मुलीचे नाव किंवा फोटो मीडियामध्ये दाखवले तर तो तिला सोडून देईल, तो तिला घटस्फोट देईल. राखीच्या या गंभीर आरोपांवर आता आदिलने मौन सोडले असून त्याने इन्स्टाग्रामद्वारे सडेतोड उत्तर दिले.

आदिलने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये असे लिहिले की, ‘मी महिलेच्या पाठीमागे बोललो नाही तर याचा अर्थ नाही की मी चुकीचा आहे. याचा एवढाच अर्थ आहे की मी माझ्या धर्माचा आदर करतो आणि मी महिलांचा आदर करायला शिकलो आहे. जर मी माझे तोंड उघडले आणि काय चालले आहे हे सांगितले आणि ती माझ्यासोबत काय करते आहे याबद्दल सांगितले तर ती तोंडही उघडू शकत नाही.’

आदिलने पुढे लिहिले की, ‘हेच कारण आहे की तिला रोज येऊन लोकांना सांगायचे आहे की आदिल खूप वाईट आहे. ज्या प्रकारे ती मी फ्रीजमध्ये असेन म्हणाली, मीही म्हणू शकतो की मला सुशांत सिंग राजपूत बनायचे नाही (ती म्हणते आदिल मुंबई माझी आहे, काहीही होऊ शकते). मी सर्वांना विनंती करू इच्छितो की हा विषय सर्वांनी सोडून द्या आणि मला जज करू नका. कोण काय आहे हे लवकरच कळेल.’

हे वाचा-शालीनची एक्स वाइफ दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर! लग्नानंतर अभिनेत्री सोडणार देश

राखीच्या नवऱ्याने पुढे लिहिले की, ‘माझ्यासारखा समजूतदार माणूस नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहिला, ज्याने तिला चांगली जीवनशैली दिली. मी एक रुपया घेऊन मुंबईला आलो असे म्हणायला सगळे सोपे आहे. खूप छान राखी. तू तुझा प्लॅन उत्तम प्रकारे राबवला पण हुशारीने नाही. राखी म्हणते की मला हिरो तसंच झिरो कसे व्हायचे हे माहीत आहे. ती म्हणते मीडिया मी तुमचे पाय पकडते, तुम्ही आदिलकडे जाऊ नका… का? कारण तो सत्य सांगेल याची तुला भीती आहे का?’

आदिल खान दुर्रानीची इन्स्टाग्राम पोस्ट

राखीचे शब्द बदलले

आदिलच्या या पोस्टनंतर राखीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला. ज्यात मी म्हणतेय की, तिला सर्वांना गुड न्यूज द्यायची आहे. राखीने सांगितले की, ‘मला देशातील जनतेला एक आनंदाची बातमी द्यायची आहे की, माझा आदिल आता माझ्याकडे परत आला. आज पुन्हा आनंदाचे भाव माझ्या चेहऱ्यावर उमटले. आता आम्ही दोघे एकत्र काम करू. आता आमचे नाते खूप चांगले आहे, आता काहीही चूक होणार नाही. नाजूक नात्यात काय बोलावे तेच कळत नाही. माझ्या डोक्यावर आघात झालेला आणि दबाव होता. मी जरा घाबरले होतो. मी माझ्या आदिलची बदनामी करणार नाही. आदिल माझा नवरा आहे. तो नेहमीच माझा असेल आणि कधीही कोणाकडे जाणार नाही.’

माझं नाव फातिमा, संसार टीकवण्यासाठी मी रडतेयं, राखींनी लोकांसमोर मांडल्या व्यथा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.