Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा महाराष्ट्रात; आदिवासींचे उगमस्थान आहे ‘कचारगड, गेल्या ४० वर्षांपासून

5

गोंदियाः गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त घनदाट जंगलात कचारगड गुहा असून आदिवासी बांधवाचे पवित्र श्रद्धास्थान आहे. या गुहेत आदिवासी बांधवाचे आराध्य दैवत म्हणजे “पारी कोपार लिंगो” ची मूर्ती आहे. मागील ४० वर्षांपासून या ठिकाणी यात्रा भरत आहे.

कचारगड यात्रेला महाराष्ट्रासह इतर १८ राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने आपल्या कुलदेवतेची पूजा व दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावतात. अत्यंत दुर्गम व निसर्गाचा सानिध्यात असलेल्या कचारगड या ठिकाणी ही यात्रा ५ दिवस चालत असते. कचारगडच्या गुहेतूनच आदिवासी बांधवचा उगम झाला अशी आख्यायिका असल्याचे बोलले जाते. कचारगडमध्ये असलेली गुहा ही निसर्गनिर्मित असून आशिया खंडातील सगळ्यात मोठी गुहा आहे. तसेच या गुहेत जवळपास ५ हजार भाविक एकाच वेळेस दर्शन घेऊ शकतात, इतकी जागा या गुहेत उपलब्ध आहे.

आदिवासी बांधव दरवर्षी कोया पौर्णिमेला या ठिकाणी येत आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेत असतात. या वेळी आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन पाहायला मिळते. या यात्रेकरीता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड, उत्तर प्रदेश, मिझोराम, मेघालय आदी १८ राज्यातून लाखो आदिवासी भाविकांची गर्दी या ठिकाणी होत असते. कचारगडच्या गुहेत आदिवासींचे आराध्य दैवत म्हणजे “पारी कोपार लिंगो” ची मूर्ती आहे. या दैवताचे दर्शन घेण्यासाठी आपल्या संस्कृतीमधील परंपरा कायम राखत आदिवासी बांधव मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी उपस्थिती लावतात. त्याच प्रमाणे विविध राज्यातील विभिन्न आदिवासी बांधव या यात्रेवेळी आपल्या राज्याच्या पंरपरेनुसार आदिवासी नृत्याचे संस्कृतीचे सादरीकरण करतात.

वाचाः नाशिकः अंधश्रद्धेचे भूत! भुताटकीचा आरोप, आठ कुटुंबांनी स्वतःच्या घराची मोडतोड करत सोडलं गाव

संस्कृतीचा अभ्यासकांसाठी ही यात्रा एक प्रकारची पर्वणीच ठरते. या आदिवासी बांधवाच्या यात्रेदरम्यान आदिवासी समाजातील रोटी-बेटीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात होत. असते त्यामुळे या यात्रेला अतिशय महत्त्व असते. कचारगड हा परिसर नक्षलग्रस्त भागात असल्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टीकोणातून मोठ्या प्रमाणात पोलीस बळ देखील या यात्रे साठी तैनात करण्यात येतो.

वाचाः पोळ्या लाटण्याच्या बहाण्याने ३ महिलांना कारमध्ये बसवलं, अज्ञात ठिकाणी नेलं अन् घडलं भयंकर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.