
Tej Police Times
क्लिक करा आणि वाचा- सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवर अखेर मामा बाळासाहेब थोरातांनी मौन सोडले, म्हणाले जे राजकारण…
त्यानंतर भाजपचे अॅड. काकडे यांनी बोलताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली. त्यावरून वादाला सुरवात झाली. सुरवातील नाहाटा आणि काकडे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले. खासदार डॉ. विखे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या समोरच हे सर्व सुरू होते. तणाव वाढत जाऊन दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. अखेर विखे यांनी हस्तक्षेप करून वाद मिटविला. ते म्हणाले, ‘यापूर्वीच जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन गेली असती तर असे प्रसंग घडले नसते. कार्यकर्त्यांना मन मोकळे करण्यासाठी संधी हवी असते. अशा कार्यक्रमांतून ती मिळते. सगळे आपलेच आहेत. निवडणूक झाल्यावर ठीक होईल,’ असे म्हणत त्यांनी सर्वांना शांत केले. त्यानंतर पुढील कार्यक्रम पार पडला.
क्लिक करा आणि वाचा- सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य, म्हणाले जात ही देवाने नाही तर पंडितांनी निर्माण केली
त्यांच्या पिताश्रींनी शब्द पाळला का? – विखे पाटील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देऊन निवडणूक लढविण्याचे आव्हान देणारे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना खासदार डॉ. विखे पाटील यांनी टोला लगावला आहे. विखे पाटील म्हणाले, ‘ज्यांनी मुख्यमंत्र्यांना हे आव्हान दिले आहे त्यांच्या पिताश्रींनी विधान परिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्यांचा शब्द अंतिम असल्याचे सांगतात, तर मग तेच आपला शब्द का पाळत नाहीत? त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांने काहीही बोलले तरी त्याला महत्व राहत नाही,’ असेही विखे पाटील म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- बीआरएस पक्षाची राज्याच्या राजकारणात एंट्री, दोन माजी आमदारांचा प्रवेश, राव यांनी मोदींना ललकारले
Recover your password.
A password will be e-mailed to you.