तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

ब्रॅंड प्रमोशनसाठी नव्हे तर…सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोंवर कंगनाची वेगळीच कमेंट

0 43

मुंबई: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा शाही विवाहसोहळा अखेर काल म्हणजेच ७ फेब्रुवारी २०२३ रोजी थाटामाटात पार पडला. या महिन्यातच ते लग्न करतील अशा चर्चा होत्या पण त्या दोघांनीही नात्याची अधिकृत घोषणा केलेली नव्हती. त्यामुळं दोघांच्या लग्नाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. राजस्थानात लग्न करण्यापासून कुटुंबाच्या तयारीपर्यंत सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू होत्या. अखेर जवळच्या मित्र-मैत्रणी, कुटुंबिय यांच्या उपस्थितीत कियारा-सिद्धार्थनं लग्नगाठ बांधली.

कियारा सिद्धार्थचं लग्न झाल्यानंतर चाहत्यांना उत्सुकता होती ती लग्नाचे फोटो पाहाण्याची. अखेर रात्री उशिरानं दोघांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर लग्नाचे शेअर करण्यात आले. फोटो शेअर करताच ते व्हायरल झाले. सिद्धार्थ कियारावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही फोटो शेअर करत सिद्धार्थ-कियाराला शुभेच्छा दिल्या. यात एका सेलिब्रिटीच्या पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे. अभिनेत्री कंगना रणौत हिनं एका ट्विटला उत्तर देताना कियारा सिद्धार्थच्या नात्यावर भाष्य केलंय.
आयुष्यभरासाठी एकमकांचे झाले कियारा-सिद्धार्थ, शेरशाह कपल अडकलं विवाहबंधनात
पटकथा लेखक अनिरुद्ध गुहा यांनी सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील एक फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करताना त्यांनी विचारलंय की. हे दोघं डेट करत होते? अनिरुद्ध यांच्या या ट्विटला उत्तर देताना कंगनानं सिद्धार्थ-कियाराचं कौतुक केलंय. तर बॉलिवूडमधील इतर जोडप्यांना टोला लगावला आहे.

कंगनानं म्हटलंय की…
‘हो, ते एकमेकांना डेट करत होते. पण ब्रॅंडच्या किंवा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नव्हे. फेम मिळवण्यासाठी बॉलिवूडच्या इतर जोडप्यांसारखं त्यांनी कधीही नात्याचा वापर केला नाही. एकदम खरं प्रेम. छान जोडी’, असं कंगनानं म्हटलं आहे.

दरम्यान, सूर्यगड पॅलसमध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून कियारा आणि सिद्धार्थ यांच्या शाही विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. लग्नाच्यावेळी नवरदेव सिद्धार्थनं धमाकेदार एंट्री घेतली. सिद्धार्थनं ‘साजन जी घर आए’ या प्रसिद्ध गाण्यावर पांढऱ्या शुभ्र घोडीवर बसून प्रवेश केला. त्याशिवाय त्याच्या मंडपप्रवेशावेळी अनेक लोकप्रिय गाणी वाजवण्यात आली होती.

अशी आहे सिृ-कियाराची लव्हस्टोरी
कियाराच्या लस्ट स्टोरीज या चित्रपटाच्या एका पार्टीत सिद्धार्थ आणि कियारा पहिल्यांदा भेटले होते. कारगिल युद्धातील हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या शेरशहा सिनेमाच्या सेटवर पुन्हा सिद्धार्थ आणि कियारा यांची भेट झाली. सुरुवातील दोघं एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि हळूहळू त्यांच्यात प्रेमाचं नातं निर्माण झालं. या सिनेमापासून दोघंजण रिलेशनमध्ये आहेत. त्यानंतर सातत्यानं जाहीर कार्यक्रमांना, पार्टींज ना एकत्र दिसले. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही जाहीर वाच्यता केली नाही. मध्यंतरी दोघांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाला होता. परंतु करण जोहरनं केलेल्या मध्यस्थीमुळं दोघांमध्ये पॅचअप झालं आणि पुन्हा ते रिलेशनमध्ये आले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.