
Tej Police Times
या पुलामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. ठाणे, घोडबंदर, भिवंडी, नाशिक, कल्याण -डोंबिवली या ठिकाणावरून सकाळी आणि संध्याकाळी चाकरमानी आणि प्रवाशी मोठ्या प्रमाणात या कोपरी पुलावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. मात्र अपुऱ्या पुलामुळे या पुलाजवळ आणि टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. मात्र या पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे प्रवाश्यांना आता दिलासा मिळणार आहे.
वाचाः राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्तीवर मोहोर, ईडीने केली कारवाई
९ फेब्रुवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या पुलाचे लोकार्पण होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तर्फे तयार करण्यात आलेल्या या पुलाचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुलाच्या उदघाटनासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, ठाणे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम तथा अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.
वाचाः ‘आधी कोर्टाचा निकाल लागू दे’; निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत उद्धव ठाकरेंची मागणी
Recover your password.
A password will be e-mailed to you.