
Tej Police Times
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनी देखील हाच कित्ता गिरवला आहे. ते सध्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय झाल्याचं दिसत आहे. नुकत्याच आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील पुराच्या वेळीही प्रतीक यांनी सांगलीत जयंत पाटलांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं होतं. पुरात अडकलेल्या लोकांना मदत, अन्न पाण्याचा वाटप करण्याबरोबरच मुक्या जनावरांची देखभाल करण्याचं कामही त्यांनी केलं. त्यानंतर आज प्रतीक यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागण्यांचं एक निवेदन दिलं. ‘सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील युवक-युवतींच्या हितासाठी नवीन उपक्रम राबविण्यात यावेत, अशी मागणी प्रतीक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
वाचा: राज्यपालांच्या आगामी दौऱ्याबद्दल मंत्रिमंडळात तातडीची चर्चा; असं काय घडलं?
‘सारथी’ संस्था मराठा समाजातील मुलांसाठी उत्कृष्ट काम करत आहे. मात्र, या संस्थेच्या माध्यमातून अधिक नवे उपक्रम राबवले जाऊ शकतात. शिक्षण प्रशिक्षण, कौशल्य विकास या त्रिसूत्रीच्या आधारे सारथीनं काम केल्यास मराठा समाजातील युवक-युवतीच्या विकासासाठी मोठं काम होईल, असं प्रतीक यांनी निवेदनात म्हटलं आहे. केवळ निवेदन देऊनच ते थांबले नाहीत, त्यांनी काही उपयुक्त सूचनाही सरकारला केल्या आहेत.
प्रतीक पाटील यांनी केलेल्या सूचना
वाचा: अमित शहांच्या भेटीसाठी शरद पवारांनी ‘हीच’ वेळ का निवडली?
Recover your password.
A password will be e-mailed to you.