Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नाना पटोले डेअरिंगबाज, करारी स्वभावाचे , पण त्यांची ‘ही’ एक गोष्ट चुकलीच: यशोमती ठाकूर

43

Maharashtra Politics | नाना पटोले यांच्याविरोधात काँग्रेसमधील बड्या नेत्यांची फौज मैदानात उतरली आहे. सगळे एकमुखाने नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावर राहून देण्यास विरोध करत आहेत. त्यामुळे लवकरच एखादा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

 

हायलाइट्स:

  • महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद शिगेला
  • नाना पटोले यांची गच्छंती अटळ?
  • प्रदेशाध्यक्षपदासाठी दिल्लीत नेत्यांची फिल्डिंग
सोलापूर: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे काँग्रेस पक्षात निर्माण झालेला अंतर्गत वाद आता शिगेला पोहोचला आहे. नाशिकच्या निकालानंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला होता. तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे, आता शक्य नसल्याची तक्रार हायकमांडला केली होती. यानंतर काँग्रेसमध्ये दोन तट पडले असून त्यांच्याकडून परस्परविरोधी विधाने केली जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाष्य केले आहे. त्या गुरुवारी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. (Internal Battle in Maharashtra congress)

यावेळी यशोमती ठाकूर यांनी एकीकडे नाना पटोले यांचे कौतुक केले असले तरी त्यांच्या तडकाफडकी स्वभावामुळे काँग्रेसला फटका बसल्याच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधले. नाना पटोले हे करारी स्वभावाचे आहेत. ते तडकाफडकी निर्णय घेतात. त्यांच्यात डेअरिंग आहे. पण नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा आम्हाला दु:ख झाले होते. संजय राऊत म्हणतात, त्याच्याशी मी सहमत आहे. नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष राहिले असते तर महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकले असते, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले. यशोमती ठाकूर यांचे हे वक्तव्य ऐकून त्यांनी नाना पटोले यांची बाजू घेतली की त्यांना शालजोडीतील टोले लगावले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

एच.के. पाटील १२ फेब्रुवारीला मुंबईत, काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार?

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर लवकरच मुंबईत पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील १२ फेब्रुवारी रोजी मुंबईत येणार आहे. त्यावेळी काय निर्णय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, नाना पटोले यांच्याविरोधात राज्यात मोठ्याप्रमाणावर नाराजी आहे. अनेक नेत्यांचा नाना पटोले यांना विरोध आहे. परिणामी येत्या काही दिवसांत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्या एखाद्या नेत्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेसमधील अनेक नेते इच्छूक आहेत. विजय वडेट्टीवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोघे दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. याशिवाय, प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत अशोक चव्हाण यांचे नावही आघाडीवर आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.