तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

असं कुठं असतंय व्हय! लग्नानंतर सिद्धार्थ -कियाराचं दिल्लीतलं रिसेप्शनही चोरी चोरी चुपके चुपके

0 33

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं चर्चा होत असलेलं ‘बॉलिवूडचं शेरशाह कपल’ सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नुकतेच लग्नबंधनात अडकले. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी राजस्थानातील जैसलमेर इथल्या सूर्यगढ पॅलेसइथं या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला.

मल्होत्रांच्या घरची सून

कुटुंबिय, मित्रमंडळी या सर्वांच्या साक्षीनं आणि शुभेच्छांसह कियारा ही मल्होत्रांच्या घरची सून झाली. मल्होत्रांच्या घरची सून झाल्यानंतर कियाराचं सासरी वाजतगाजत स्वागत करण्यात आलं. कियाराच्या गृहप्रवेशावेळी ढोल वाजवून भांडगा करत कुटुंबियांनी तिचं स्वागत केलंय.

कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नानंतर आता त्यांच्या रिसेप्शची चर्चा सुरू आहे. सिद्धार्थ दिल्लीचा असल्यानं काल म्हणजेच ९ तारखेला दिल्लीत ग्रॅंड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. पण याचे फोटोही अद्यापही समोर आले नाहीत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शनचे फोटो समोर न आल्यानं नेटकरीही नाराज आहेत. सोशल मीडियावर मीम्स व्हायरल केले जात आहेत.

मुंबईच्या रिसेप्शनची उत्सुकता
दिल्लीनंतर कियारा आणि सिद्धार्थ त्यांच्या बॉलिवूडमधील मित्र मैत्रिणींसाठी मुंबईतही रिसेप्शन ठेवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिड आणि कियारा यांचं हे रिसेप्शन १२ तारखेला म्हणजेच रविवारी होणार आहे. या रिसेप्शनला बॉलिवूड तसंच इतर क्षेत्रातली दिग्गज मंडळी हजेरी लावण्याची शक्यता आहे.
अचानक इतकी गोरी कशी झाली? स्किन कलरवरुन ट्रोल करणाऱ्यांना काजोलचं चोख उत्तर

गेल्या दोन तीन महिन्यांपासून कियारा आणि सिद्धार्थ यांच्या शाही विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात येत होतं. अखेर हा सोहळा पार पडला. लग्नावेळी नवरदेव सिद्धार्थनं ‘साजन जी घर आए’ या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करत एन्ट्री केली होती.

वऱ्हाडी कोण कोण?

या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रेटी वऱ्हाडी म्हणून सहभागी झाले होते. यात शाहिद कपूर, मीरा कपूर, करण जोहर यांचा समावेश होता. ७ तारखेला चार वाजता सिद्धार्थ-कियारानं चारच्या सुमारास सप्तपदी घेण्यास सुरुवात केली.
चाललंय काय? शुभमन गिलनंतर पुन्हा कार्तिक आर्यनला भेटली सारा? चाहत्यांची प्रतिक्रिया तर पाहा
‘नो फोन पॉलिसी’

बॉलिवूडच्या इतर सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्याप्रमाणं या लग्नसोहळ्यात ‘नो फोन पॉलिसी’चा अवलंब करण्यात होता. कुटुंबीय, पाहुणे, मित्रमंडळी, बॉलिवूड सेलिब्रेटी यांच्यासह हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनाही लग्नसोहळ्यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट न करण्याची विनंती करण्यात आली होती; त्यामुळं लग्नाच्या रात्री उशिरानं त्यांच्या टीमनं फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.