Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आयुष्य संपवायला निघाले होते कैलाश खेर, त्या कठिण काळाबद्दल पहिल्यांदाचे बोलले

31

मुंबई: लोकप्रिय गायक कैलाश खेर यांना आज कोण ओळखत नाही. जगभरात त्यांचे चाहते आहेत. पण त्यांच्या इथपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेकांप्रमाणं त्यांच्या वाट्यालाही संघर्ष आला. पण त्यांनी प्रयत्न करणं सोडलं नाही. स्ट्रगल करत करत त्यांनी यशाचा मार्ग शोधलाच. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कैलाश खेर यांनी त्यांच्या स्ट्रगलबद्दल सांगितलंय. एक वेळ अशीही आली होती, ती जेव्हा कैलास खेर यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा त्यांनी या मुलाखीत केला.

कैलाश यांनी त्यांच्या संघर्षाबद्दल, कठिण काळाबद्दल मनमोकळेपणानं गप्पा मारल्या. सुरुवातीला त्यांनी दिवस ढकलण्यासाठी वाट्टेल त्या नोकऱ्या केल्या. तेव्हा त्यांचं वय केवळ २० -२१ वर्ष होतं. त्यांनी त्यानंतर दिल्लीत एक्सपोर्टचा बिझनेसही सुरू केला होता. ते हस्तशिल्प आणि त्याचं सामान जर्मनीला एक्सपोर्ट करायचे. पण त्यांच्या हा बिझनेस अचानक बंद पडला.
मौसम बिगड़ने वाला है! किरण मानेंच्या आयुष्यात घडतंय काही तरी मोठ्ठं,फोटो शेअर करत म्हणाले…
बिझनेसमध्ये सततचं होणारं नुकसान यामुळं कैलाश खेर पुरते तुटले होते. त्यानंतर ते पंडित व्हायला, आध्यात्म शिकायला ऋषिकेशला आले होते. पण इथंही त्यांचं मन रमत नव्हतं. त्यांना असं वाटायचं की,त्यांची जागा इथं नाहीये. कारण त्यांच्यासोबत असणारी मुलं वयानं खूप लहान होती. त्यामुलांचे आणि कैलाश खेर यांचे विचारही जुळायचे नाहीत. त्यामुळं ते प्रचंड निराश झाले होते.प्रत्येक ठिकाणी येणारं अपयश. या अपयशामुळं कैलाश खेर यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. एक दिवशी ते गंगा नदीच्या काठावर गेलेनदीत उडी मारली तो पर्यंत असं काही झालं की, नंतर त्यांचं आयुष्यच बदललं. नदीत उडी मारल्यानंतर एका व्यक्तीनं त्यांना वाचवलं.
अभिनेता प्रभासनं घेतला कामातून घेतला ब्रेक, चर्चा मात्र क्रिती सेनॉनची; कारण तरी काय?
त्या व्यक्तीनं कैलाश यांना विचारलं की, पोहायला येत नाही तर, नदीत उडी कशाला मारली. तेव्हा त्याच्यासमोर कैलाश खेर यांनी मन मोकळं केलं होतं. आत्महत्येचं नाव घेताच त्या माणसानं कैलाश खेर यांच्या डोक्यावर टपली मारली. त्या एका टपलीनं कैलाश खेर यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यांचं आयुष्य बदललं. त्यानंतर आयुष्यात काय तरी मोठं करायचं असा निश्चयच त्यांनी त्यावेळी केला. स्वत:ला सिद्ध करतत आज ते लाखो जणांचे आदर्श आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.