
Tej Police Times
या योजनेंतर्गत आमने, मराळ, डवाळा, मांडवा, दाव्हा, शिवनी, रेंकापूर व वायफळ या आठ ठिकाणी मुंबई-नागपूर व नागपूर-मुंबई या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी ४ हेक्टरवर सुविधांची उभारणी होणार आहे. एका बाजूने आठ म्हणजेच एकूण १६ ठिकाणी अशा सुविधा असतील. प्रत्येक ठिकाणासाठी किमान ५० कोटी रुपयांचा खर्च संबंधित विकासक व कंत्राटदाराला करायचा आहे. यासाठी पाच वर्षांचा कालवधी निश्चित करण्यात आला आहे. निविदा भरण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे.
१ हजार कोटींची गुंतवणूक
अशाच सुविधांसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील वरझाडी व नाशिक जिल्ह्यातही १० ते १२ हेक्टर जमिनीचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ शोध घेत आहे. त्या जमिनीवरदेखील ५० कोटी रुपये खर्चून विकासकांना सुविधांची उभारणी करायची आहे. २० फेब्रुवारी ही त्यासंबंधीच्या निविदेची अखेरची तारीख आहे. अशाप्रकारे समृद्धी महामार्गावरील सुविधेपोटी किमान १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य रस्ते विकास महामंडळ पुढील पाच वर्षांत करणार आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.