
Tej Police Times
महामंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी माहिती दिली. या वेळी पुणे जिल्हाध्यक्ष प्रसन्न कोतुळकर, कार्याध्यक्ष विनोद गोरे आदी उपस्थित होते. राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती २००५पासून बंद आहे. त्यामुळे आता शाळांमध्ये बोटावर मोजण्याइतके कर्मचारी राहिले आहेत. अशा परिस्थितीत शाळांमधील रिक्त पदे आकृतीबंधानुसार भरण्यासाठी सरकारने तत्काळ निर्णय प्रसिद्ध करण्याची आवश्यकता आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळत असताना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक १०, २०, ३० (सेवा वर्षे) योजनेचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. जुनी पेन्शन योजना लागू होत नसल्याने, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना हार पत्कारावी लागली. योजना लागू होणार नसल्यास यापुढील निवडणुकीत मतांच्या माध्यमातून कर्मचारी आपली शक्ती दाखविणार आहेत.
राज्य सरकार आणि मंत्र्यांकडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केवळ आश्वासने देण्यात येत असून, प्रत्यक्षात कोणताही निर्णय होत नसल्याने परीक्षा काळात काम न करण्याचे ठरवले आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास दहावी आणि बारावीच्या परीक्षा कालावधीत परीक्षेशी निगडित कोणतेही काम करण्यात येणार नाही, अशा इशारा खांडेकर यांनी दिला आहे.
राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी येत्या सोमवारी, १३ फेब्रुवारीला शनिवारवाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यभरातून कर्मचारी येणार असून, त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रसन्न कोतुळकर यांनी केले आहे.
– आश्वासित योजनेचे तीन लाभ देणे
– आकृतीबंधाला मान्यता देऊन, पदभरती करणे
– जुनी पेन्शन योजना लाघू करणे
– मानधनात भरीव वाढ करणे
– ग्रंथपालांना पूर्णवेळ करणे
HSC Exam: बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा लांबणीवर
Recover your password.
A password will be e-mailed to you.