
Tej Police Times
गेल्या अधिवेशनात विरोधकांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन सभागृह डोक्यावर घेतले होते. येत्या काही दिवसांमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. तेव्हादेखील महाविकास आघाडीकडून कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली असती. त्यापूर्वीच भगतसिंह कोश्यारी यांची इच्छा मंजूर करून त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्याच महिन्यात मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळ भगतसिंह कोश्यारी यांनी मोदींकडे राज्यपाल पदावरुन पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मला आयुष्यातील उर्वरित काळ मनन आणि चिंतन करण्यात घालवायचा आहे. त्यामुळे मला राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली होती. तेव्हापासूनच कोश्यारी राज्यपाल पदावरुन कधी दूर होणार, याची चर्चा सुरु होती. त्यांना कोणत्याही क्षणी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन हटवले जाईल, अशी चर्चा होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आतापर्यंत अनेकदा राज्यपाल कोश्यारी यांच्या भूमिकेविषयी शंका व्यक्त केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल कोश्यारी सरकारच्या कारभारात हस्तक्षेप आणि अडवणूक करत असल्याचा आरोप सातत्याने होई. मात्र, कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याविरोधात प्रचंड आक्रमक झाली होती. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी, ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून महाराष्ट्राची सुटका झाली तर ती आनंदाची बाब ठरेल’, असे वक्तव्य केले होते.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.