Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

म्हणून दरडग्रस्तांना दिलेले मदतीचे चेक परत घेतले: अनिल परब

39

हायलाइट्स:

  • पोसरे येथील दरडग्रस्तांकडून मदतीचे चेक घेतले परत
  • पालकमंत्री अनिल परब यांनी केला खुलासा
  • १७ पैकी १६ मृतांच्या वारसांना मदत मिळाल्याची अधिकाऱ्यांची माहिती

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पोसरे गावात दरड कोसळून मृत्यू झालेल्या १७ व्यक्तींच्या वारसांना देण्यात आलेले मदतीचे चेक दुसऱ्याच दिवशी परत घेण्यात आल्यामुळं राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी हे चेक परत घेण्यात आल्याचं मान्य केलं आहे. मात्र, ते का परत घेतले याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Anil Parab on Posare Cheque Row)

करोना लढा: मुंबई महापालिकेच्या भात्यात आणखी एक हुकुमी ‘शस्त्र’

‘सरकारनं केलेल्या घोषणेनुसार, पोसरे गावातील मृतांच्या वारसांना मी स्वत: जाऊन मदतीचे चेक दिले होते. मात्र, ज्या बँकेत चेक डिपॉझिट करावयाचे होते, ती बँक ३० किलोमीटर लांब होती. तिथं जाण्याची अडचण होती. शिवाय, अनेक घरं दरडीखाली गेल्यानं काही लोकांच्या बँक खात्याचे क्रमांक व अन्य तपशीलही मिळत नव्हता. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर गावातील प्रमुख प्रतिनिधींनी सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सरकारचा एक प्रतिनिधी आमच्याबरोबर दिला जावा व त्यांनी चेक जमा करण्यास मदत करावी, अशी विनंती गावच्या प्रतिनिधींनी केली. त्यांच्या विनंतीवरून दुसऱ्या दिवशी तलाठ्यांनी हे चेक परत घेतले. ज्या वारसांच्या बँकेचा तपशील उपलब्ध नव्हता किंवा ज्यांना बँकेत जाणं शक्य नव्हतं, अशा लोकांचे चेक स्वत: सरकारी प्रतिनिधींनी जमा केले आहेत,’ असं अनिल परब यांनी सांगितलं. याबाबत दाखवल्या जाणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नसल्याचं त्यांनी सांगितलं.

वाचा: ‘मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेंचे पाय धरले का, हे महाराष्ट्राला समजायला हवं’

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी देखील अनिल परब यांच्या माहितीस दुजोरा दिला आहे. ‘पोसरे गावातील चार व्यक्तींच्या बँक खात्याचे तपशील उपलब्ध नव्हते. त्यांची खाती शोधून काढून सरकारी प्रतिनिधींनी त्यांचे चेक जमा केले आहेत. एकूण १७ वारसांपैकी १६ जणांचे ६२ लाखांचे चेक जमा करण्यात आले आहेत. एका व्यक्तीचा वारस पुढं न आल्यानं मदत प्रलंबित आहे,’ असं पाटील यांनी सांगितलं.

वाचा: धर्मभास्कर वाघ याचं नाव घेऊन भाजपचा ठाकरे सरकारवर आरोप; कोण आहे हा माणूस?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.