Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Somvati Amavasya 2023: वर्षातील पहिली सोमवती अमावस्या, वाचा महत्व आणि कथा

4

सोमवती अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी शिव आणि पितरांची पूजा केल्याने अनेकविध लाभ होतात. सुहागन स्त्रिया या दिवशी शिवपार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात आणि सोमवतीदेवीकडे सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहावा याकरीता आशीर्वाद मागतात.

सोमवती अमावस्या व्रत कथेचे पठण करावे


सोमवती अमावस्येची कथा अशी की, एका सावकाराला सात मुले आणि एकच मुलगी होती. एक ब्राह्मण अनेकदा त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी येत असे. जेव्हा जेव्हा सावकाराची मुलगी भिक्षा घेऊन यायची तेव्हा तो ब्राह्मण भिक्षा घेण्यास नकार देत असे आणि तीला म्हणायचा की तुझ्या नशिबात चांगले भाग्य लिहिलेले नाही. हे ऐकून सावकाराची मुलगी दुःखी व्हायची. असे अनेकवेळा घडले, मग एके दिवशी सावकाराच्या मुलीने तिच्या आईला सगळा प्रकार सांगितला, एक ब्राह्मण कसा भिक्षा मागायला येतो आणि तिच्याकडून भिक्षा घेण्यास नकार देतो.

सावकाराच्या बायकोने तिच्या मुलीला सांगितले की, पुढच्या वेळी भिकारी येईल तेव्हा मला सांग. एके दिवशी भिकारी दारात आला तेव्हा सावकाराची बायको दाराच्या मागे लपून सर्व काही ऐकत होती. नेहमीप्रमाणेच घडले. भिकाऱ्याने भिक्षा घेण्यास नकार दिला आणि सांगितले की, तुझ्या नशिबात विधवा होण्याचे लिहिले आहे,सौभाग्य प्राप्ती नाही. हे ऐकून सावकाराची बायको दारातून बाहेर आली आणि भिकाऱ्याला म्हणू लागली की आम्ही भिक्षा देतो, वरून तू आम्हाला एक अशुभ गोष्ट सांगत आहेस. ब्राह्मण म्हणाला की मी जे बोलतो ते खरे आहे, तुझ्या मुलीच्या नशिबात सौभाग्य प्राप्ती लिहिलेले नाही. जेव्हा तुमची मुलगी लग्नाच्या वेळी सप्तपदी घेत असेल, त्याच वेळी एक साप येईल आणि तिच्या पतीला चावेल आणि ती विधवा होईल.

ब्राह्मणाचे बोलणे ऐकून सावकाराची बायको दु:खी झाली, पण नंतर ती ब्राह्मणाला म्हणाली की ती विधवा होणार हे तुला माहीत असेल तर तिच्या सौभाग्याचे रक्षण कसे होईल हेही सांगा. सावकाराच्या बायकोने हे विचारल्यावर ब्राह्मण म्हणाला की इथून खूप दूर एक गाव आहे तिथे सोना धोबी राहते. ती प्रत्येक सोमवती अमावस्येला उपवास करते. त्यामुळे तिचं सौभाग्य दृढ आहे. तिने येऊन तिचं सौभाग्य तुमच्या मुलीला दिले तर ती विधवा नाही होणार.

ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून सावकाराच्या पत्नीने ब्राह्मणाचे आभार मानले आणि ती सोना धोबिणीच्या शोधात निघाली. एके दिवशी भरपूर उन्हामुळे ती पिंपळाच्या सावलीत विश्रांती घेत होती. तेव्हा त्याने पाहिले की एक साप आला आणि गरुडाच्या पिलांना खाण्यासाठी त्या पिंपळाच्या झाडावर चढू लागला. सावकाराच्या पत्नीने सापाला मारून गरुडाच्या मुलांचे रक्षण केले. इतक्यात गरुडही तेथे आला आणि त्याने पाहिले की, सर्वत्र रक्त पसरले आहे. गरुडला वाटले की सावकाराच्या बायकोने आपल्या मुलांचे नुकसान केले आहे. म्हणून गरुडाने तिच्यावर हल्ला केला पण सावकाराच्या पत्नीने त्याला थांबवले आणि सांगितले की, तिने मुलांचे रक्षण केले आहे. जेव्हा गरुडाला हे सत्य कळले तेव्हा तो म्हणाला की तुम्ही माझ्या मुलांचे रक्षण केले आहे, तर मला सांगा की मी तुम्हाला कशी मदत करू?

तेव्हा सावकाराच्या पत्नीने गरुडाला सांगितले की, ती सोना या धोबीणीच्या शोधात निघाली आहे, ती कुठे राहते हे सांगितले तर खूप उपकार होतील. गरुड सावकाराला सोना धोबीणीच्या गावी घेऊन गेला. सोना धोबीण यांना सात मुले आणि सुना होत्या. पण घरातील कामावरून सूनांमध्ये भांडण व्हायचे. सावकाराच्या पत्नीला यावर उपाय सुचला आणि रोज रात्री सगळे झोपले की ती गुपचूप सोना धोबिणीच्या घरी जायची आणि घरातील कामे करून निघून जायची. असे बरेच दिवस चालले असताना एके दिवशी सोना धोबीन लपून बसून सर्व काही पाहिले. सावकाराची पत्नी निघून जाऊ लागली तेव्हा धोबीणीने तिला पकडले आणि विचारले की तू कोण आहेस आणि तू अशी घरची कामे करून का निघून जातेस. सावकाराची पत्नी म्हणाली की मी सर्व काही सांगेन पण आधी वचन दे की सर्व सत्य जाणून घेऊन तू मला मदत करशील. सोना धोबीणीने सावकाराच्या पत्नीला वचन दिले.

सावकाराच्या पत्नीने घडलेला सगळा प्रकार सोना धोबिणीला सांगितला आणि तिला सोबत यायला सांगितले. सोना धोबीन सावकाराच्या घरी गेली आणि तिच्या सुनेला म्हणाली की मी परत येईपर्यंत तुमचे सासरे मरुन जातील. मात्र त्यांचे शरीर तेलात बुडवून ठेवा,अंतिम संस्कार करू नका. सोना धोबीन सावकाराच्या घरी आला आणि सावकाराच्या मुलीचे लग्न सुरू असताना फेऱ्यांमध्ये एक साप आला. सोना धोबीणीने त्या सापासमोर दूध ठेवले आणि तो साप दूध पिऊ लागला. धोबीणीने त्याला मारले. यानंतर सोना धोबन म्हणाली, मी आजवर जे काही सोमवती अमावस्या व्रत केलेत, त्याचे पुण्य फळ मी सावकाराच्या मुलीला देते. यानंतर सावकाराच्या मुलीचे सौभाग्य कायम टिकून राहीले.

यानंतर सोना धोबिन आपल्या गावी परत जाऊ लागली, वाटेत जातांना मग एके दिवशी सोमवती अमावस्या आली. धोबन यांनी या दिवशी उपवास केला आणि पिंपळाची पूजा केली. कथा वाचली. दरम्यान, सोना धोबीन यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. घरी आल्यावर तिने सोमवती अमावस्येचे पुण्य पतीला दिले. यामुळे तिचा मृत पती पुन्हा जिवंत झाला. जेव्हा लोकांनी सोना धोबीनला विचारले की तू तुझ्या मृत पतीला कसे जिवंत केलेस, तेव्हा तिनी सांगितले की सोमवती अमावस्येच्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे पतीला जिवंत करण्यास मदत झाली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.